Homeताज्या बातम्याAbhishek Filmfare controversy : "पुरस्कार खरेदी केल्याच्या आरोपावर अभिषेक बच्चनची सडेतोड प्रतिक्रिया...

Abhishek Filmfare controversy : “पुरस्कार खरेदी केल्याच्या आरोपावर अभिषेक बच्चनची सडेतोड प्रतिक्रिया – ‘मी मेहनतीने मिळवला, पैशाने नाही!’”

Times of Maharashtra desk, Abhishek Filmfare controversy: अभिनेता अभिषेक बच्चनला नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
त्याच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत त्याला पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला असून, आय वॉक टू टॉक या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. परंतु यावर एका युजर ने सोशल मीडियावर “हा पुरस्कार जिंकला नसून खरेदी केला आहे” असा आरोप केला आहे. या आरोपावर अभिनेत्याने उत्तर दिले असून अभिनेत्याची ती पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

नक्की काय म्हणालं सोशल मिडिया युजर
अभिषेक अभिनेता म्हणून कितीही मैत्रीपूर्ण असला तरी त्याने एका पुरस्कारासाठी कसे पैसे दिले आणि वाईट जनसंपर्क वापरून स्वतःला कशाप्रकारे उत्तम दाखवण्याचा प्रयत्न केला, याचं उदाहरण या पुरस्कारामुळे समोर आलं आहे. संपूर्ण करिअरमध्ये एकही सोलो ब्लॉकबस्टर चित्रपट नसला तरी अभिषेकला यावर्षी ‘आय वाँट टू टॉक’साठी पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट काही मोजक्या पैसे मिळालेल्या समीक्षकांशिवाय कोणीही पाहिलेला नाही. आता अचानक मला असे ट्विट्स दिसत आहे, ज्यात 2025 हे अभिषेकचं वर्ष असल्याचा दावा केला जात आहे. हे सर्व खूपच मजेशीर आहे. त्याच्यापेक्षा बरेच चांगले कलाकार आहेत, जे खरंच पुरस्कारांसाठी पात्र आहेत. पण दुर्देवाने त्यांच्याकडे जनसंपर्काचा जाणकार किंवा पैसाही नाही”,

या वर काय म्हणाला अभिनेता?
युजर ने अभिषेक वर असा आरोप करताच अभिनेत्याने ही युजर ला चांगलेच उत्तर दिले आहे . त्याने एक्स (ट्विटर) अकाऊंटवरील पोस्टमध्ये त्या युजरला सडेतोड उत्तर दिले आहे . अभिनेता म्हणाला ‘मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी कधीही कोणतेही पुरस्कार खरेदी केलेले नाहीत किंवा मी कधीही भरभरून पीआर केलेलं नाही. मी जे काही केलं, ते कठोर परिश्रम करून, घाम गाळून आणि अश्रू वाहून केलं आहे. पण मी जे काही बोलतोय किंवा लिहितोय त्यावर तुम्ही विश्वास ठेवाल असं मला वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला शांत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अधिक मेहनत करणं. जेणेकरून तुम्हाला भविष्यातील माझ्या कोणत्याही कामगिरीवर कधीही शंका उपस्थित होणार नाही. मी तुम्हाला चुकीचं सिद्ध करेन आणि तेसुद्धा अत्यंत आदरपूर्वक मार्गाने.’
अभिषेक च्या या उत्तरानंतर अभिषेक च्या चाहत्यांनी अभिषेक च्या कामाचे कौतुक करत. सोशल मीडियावर अभिनेत्याला पाठींबा दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!