प्रवीण चौधरी (परभणी प्रतिनिधी): राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना परभणी येथे आयोजित शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेत जिल्ह्यातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, अजितदादा पवार हे केवळ नेते नव्हते, तर लाखो कार्यकर्त्यांचा आधार आणि विश्वास होते. त्यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळत असे. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राला अपूरणीय हानी झाली आहे, अशी भावना आ. राजेश विटेकर यांनी व्यक्त केली.

शोकसभेत अजितदादांच्या विचारसरणी, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि विकासाची दृष्टी यांची आठवण कायम राहील, असा मत व्यक्त करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी दादांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आठवणी उजळल्या.
यावेळी खा. संजय जाधव, आ. रत्नाकर गुट्टे, माजी आ. सुरेशदादा देशमुख, माजी खा. तुकाराम रेंगे, माजी महापौर प्रताप देशमुख, माजी आ. विजय भांबळे, अशोक सोनी, सुरेश नागरे, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, शिवसेना महानगर प्रमुख डॉ. विवेक नावंदर, माजी आ. विजय गव्हाणे, तहसीन खान, संतोष बोबडे, सचिन अंबिलवादे, चंद्रकांत राठोड, उपनगराध्यक्ष अंकुश लाड, मोइज मास्टर, लक्ष्मीकांत देशमुख, भावनाताई नखाते, विजय जामकर, अक्षय देशमुख, शाकीर सिद्दिकी, जाकीर लाला, दादासाहेब टेंग्से यांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व महापालिकेचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.






















