Homeउद्योगसोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना फटका.

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना फटका.

Times Of Maharashtra Desk : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा नववा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सोने व चांदीवरील आयात शुल्क किंवा जीएसटी कमी होईल, अशी अपेक्षा ग्राहकांपासून सराफांपर्यंत सर्वांनाच होती. मात्र, अर्थसंकल्पात सोने-चांदीबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने दरांवर थेट परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे.

अर्थसंकल्पात कोणताही निर्णय न घेतला गेल्यामुळे सोने आणि चांदीचे दर सध्याच्या पातळीवरच कायम राहतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.

 मध्यमवर्गी माणूस सुखावला-गुंतवणुकदारांचा अपेक्षाभंग 

गेल्या दोन दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे चित्र आहे. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सोने-चांदीवरील करांबाबत कोणतीही नवी तरतूद नसल्याने दरांवर त्याचा थेट परिणाम झाला नसला, तरी जागतिक बाजारातील दबावामुळे घसरण सुरूच आहे.
काल जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ६० हजार रुपये प्रति तोळा होता. मात्र, आज तब्बल ५ हजार रुपयांची घसरण होऊन सोन्याचा दर १ लाख ५५ हजार रुपये झाला आहे. तर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, ३० हजार रुपयांनी घट होऊन चांदीचे दर २ लाख ७० हजार रुपयांच्या खाली आले आहेत.

१ फेब्रुवारी २०२६ रोजी अर्थसंकल्पाच्या दिवशीही सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. स्पॉट मार्केटमध्ये चांदीचा दर २ लाख ६५ हजार ६०० रुपये इतका झाला आहे. काही दिवसांपूर्वी चांदीने ४ लाख २० हजार रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र, ज्या वेगाने दर वाढले होते, त्याच वेगाने ते खाली आले असून, चांदीचे दर जवळपास १ लाख ३४ हजार रुपयांनी घसरले आहेत.

केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील आयात शुल्क कमी केले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे न झाल्याने बाजारात निराशा आहे. गेल्या काही दिवसांत दर वाढत असल्याने गुंतवणूकदारांकडून गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात होती. मात्र, आज ईटीएफमध्येही घसरण पाहायला मिळाली आहे.दरम्यान, सोन्या-चांदीच्या किमती घसरल्याने सामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी बाजारातील अस्थिरता कायम असल्याने पुढील काळात दरांमध्ये चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!