Homeदेश-विदेशमहागाईविरोधी आंदोलन, अमेरिकेचा दबाव; इराणमध्ये मोठ्या उलथापालथीचे संकेत

महागाईविरोधी आंदोलन, अमेरिकेचा दबाव; इराणमध्ये मोठ्या उलथापालथीचे संकेत

Times of Maharashtra : वेनेजुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आता अमेरिकेचा पुढचा टारगेट कोण, यावर चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर इराण असल्याच्या अटकळींना वेग आला आहे.

इराणची राजधानी तेहरानसह देशभरात महागाईविरोधात तीव्र आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनांदरम्यान अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या परिस्थितीचा हवाला देत ट्रम्प यांनी इराण सरकारला थेट इशारा दिला आहे. आंदोलकांवर हिंसाचार केल्यास अमेरिका कठोर प्रत्युत्तर देईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

ट्रम्पच्या इशाऱ्यानंतर इराणची रणनिती बदलली

ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराण सरकार सतर्क झाले असून आंदोलने हाताळण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत थेट कारवाई करणाऱ्या सुरक्षा दलांनी आता ‘टार्गेट अटॅक’ धोरण स्वीकारल्याचे वृत्त आहे. म्हणजेच आंदोलकांवर सरसकट कारवाई न करता निवडक व्यक्तींना लक्ष्य केले जात आहे.

यासोबतच इराणच्या राष्ट्रीय संसदेत संरक्षण समितीची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून, गुप्तचर यंत्रणांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.

खामेनेई तेहरान सोडणार?

दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी वेनेजुएलातील घडामोडींमधून धडा घेत ‘प्लान बी’ तयार केल्याची माहिती समोर येत आहे. परदेशी माध्यमांच्या वृत्तानुसार, ८६ वर्षीय खामेनेई तेहरान सोडून रशियात आश्रय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

खामेनेईंच्या कुटुंबीयांसह सुमारे २० जवळच्या सहकाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याची योजना आखण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संभाव्य उत्तराधिकारी मानले जाणारे त्यांचे पुत्र मोज्तबा यांचाही या यादीत समावेश असल्याची माहिती आहे.

इतकेच नव्हे, तर खामेनेई यांच्यासोबत अब्जावधी डॉलरची संपत्तीही रशियात हलवली जाऊ शकते, असा दावा केला जात आहे. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत रशिया हेच त्यांच्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

इराणमधील वाढते आंदोलन, ट्रम्प यांच्या आक्रमक इशाऱ्यांमुळे आणि सत्तांतराच्या चर्चांमुळे मध्यपूर्वेतील राजकारण धगधगत असून, पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!