Homeताज्या बातम्याहायवे असो, विमानतळ असो की रेल्वे..; पायाभूत सुविधांवर सरकारचे विशेष लक्ष, पाहा...

हायवे असो, विमानतळ असो की रेल्वे..; पायाभूत सुविधांवर सरकारचे विशेष लक्ष, पाहा आकडे

दिल्ली : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार आल्यापासून देशभरातील पायाभूत सुविधांमध्ये बरीच प्रगती झाली आहे. यातच आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एक महत्वाची माहिती दिली.

लोकसभेत बोलताना ते म्हणाले की, मोदी सरकार लोकांचे जीवन सुकर करण्यासाठी पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्चात सातत्याने वाढ करत आहे. चालू आर्थिक वर्षासाठी 11.11 लाख कोटी रुपयांचे भांडवली खर्चाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत.

पंकज चौधरी पुढे म्हणाले की, सरकारचा भांडवली खर्च 2021-22 मधील 5 लाख कोटी रुपयांवरून 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात 11.11 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. मोदी सरकारचे लक्ष चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आहे. गेल्या 10 वर्षांत देशातील रस्ते, विमानतळ आणि रेल्वे क्षेत्रात लक्षणीय सुधारणा झाली आहे. यामुळे लोकांचे जीवन अधिक सोपे आणि सोयीस्कर झाले आहे.

राष्ट्रीय महामार्गांचे जाळे 1.6 पटीने वाढले

राष्ट्रीय महामार्गांचे जाळे 1.6 पटीने वाढले आहे. 2014 मध्ये 91,287 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते, जे नोव्हेंबर 2024 पर्यंत 1,46,195 किमी पर्यंत वाढले आहेत. भारतमाला प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात 34,800 किमी राष्ट्रीय महामार्ग बांधले जाणार आहेत. त्यापैकी 26,425 किलोमीटरचे काम देण्यात आले आहे, तर 18714 किमी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. देशातील कार्यरत विमानतळांची संख्या दुपटीने वाढली आहे. 2014 मध्ये 74 विमानतळांवरून उड्डाणे सुरू होती, तर 2024 मध्ये देशातील 158 विमानतळांवरून विमानसेवा सुरू होणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

97 टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण 

रेल्वेबाबत पंकज चौधरी म्हणाले, 97 टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई नेटवर्कच्या बळकटीकरणामुळे देशातील आर्थिक विकासाचा वेग तर वाढला आहेच, पण स्थानिक पातळीवर मूलभूत सुविधांमध्येही सुधारणा झाली आहे आणि त्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : पालम तालुक्यातील रावराजूर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दि. १४ एप्रिल) विविध कार्यक्रमांचे उत्साहात...

Bopodi: बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती…

0
Times Of Maharashtra Desk, Pune: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक...

NCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक निरीक्षक दीपक...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : येथील बसस्थानकात सध्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना, प्रवाशांमध्ये विविध अफवा पसरत असल्याचे दिसून येत...

जय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कारखान्याच्या कार्यालयात कार्यस्थळावर ‘डॉ....

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय...

रावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : पालम तालुक्यातील रावराजूर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दि. १४ एप्रिल) विविध कार्यक्रमांचे उत्साहात...

Bopodi: बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती…

0
Times Of Maharashtra Desk, Pune: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक...

NCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक निरीक्षक दीपक...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : येथील बसस्थानकात सध्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना, प्रवाशांमध्ये विविध अफवा पसरत असल्याचे दिसून येत...

जय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कारखान्याच्या कार्यालयात कार्यस्थळावर ‘डॉ....

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय...
error: Content is protected !!