Homeमहाराष्ट्रब्रह्मपुरी–उमरखेड बससेवा बंद; प्रवाशांचा संताप, आंदोलनाचा इशारा

ब्रह्मपुरी–उमरखेड बससेवा बंद; प्रवाशांचा संताप, आंदोलनाचा इशारा

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ब्रह्मपुरी ते उमरखेड दरम्यान धावणारी एसटी बससेवा मागील पंधरा ते वीस दिवसांपासून बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशी सेवा असोसिएशन, ब्रह्मपुरी शाखेच्या वतीने बससेवा पूर्ववत सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.

उमरखेड, पुसद, दारव्हा, वणी आणि यवतमाळ या मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, महिला, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी ही बससेवा अत्यंत महत्त्वाची होती. मात्र सध्या या मार्गावर ब्रह्मपुरी आगाराची एकही बस नसल्यामुळे प्रवाशांना पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागत असून, त्यात वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहेत.

प्रवाशी सेवा असोसिएशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डांगे यांनी यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे निवेदन देऊन ही सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मागील तीन ते चार वर्षांपासून ही बससेवा नियमित सुरू होती. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, ब्रह्मपुरी आगारालाही या मार्गावरून चांगले उत्पन्न मिळत होते.

मात्र अचानक ही सेवा बंद केल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबत प्रशांत डांगे यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापक जयकुमार इंगोले यांना निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर बससेवा पूर्ववत सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

निवेदन देताना राहुल भोयर, अमरदीप लोखंडे, शरद भानारकर, रमाकांत अरगेलवार यांसह इतर सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...
error: Content is protected !!