Homeशहरहिंदू धर्माचरण प्रत्येक घरात झालं पाहिजे; आपण कसं जगलं पाहिजे हे आपल्याला...

हिंदू धर्माचरण प्रत्येक घरात झालं पाहिजे; आपण कसं जगलं पाहिजे हे आपल्याला धर्म सांगतो- स्वप्नील राऊत

देऊळगाव राजा ( प्रतिनिधी बबनराव नागरे) : हिंदू धर्माची एकजूट साधून राष्ट्राला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने तसेच जाती, पंथ, भाषा आणि भेद विसरून संस्कृतीचे संरक्षण व सामुदायिक विकास घडवून आणण्याच्या हेतूने सकल हिंदू समाजाच्या वतीने देशभर हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून शहरातील बालाजी नगर परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्ती येथे दिनांक 22 मार्च रोजी हिंदू संमेलन उत्साहात पार पडले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्थापना होऊन 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यात अशा संमेलनांद्वारे एकतेचा संदेश दिला जात आहे. या संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या संघाचे प्रचारक स्वप्निल राऊत यांनी हिंदू संस्कृतीचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “विविधतेत एकता” हा हिंदुत्वाचा मूलमंत्र आहे. प्रत्येक प्राण्यात देव पाहण्याची दृष्टी हीच आपल्या संस्कृतीची ओळख असून समाजात परस्पर सन्मान आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी हे तत्त्व आचरणात आणणे आवश्यक आहे. पुढील पिढीमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात महिला प्रतिनिधी म्हणून प्रा. अश्विनी जाधव-मेहेत्रे यांनी “स्त्री शक्ती” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन समाजात आपली भूमिका बजावावी, तसेच निडरपणे आपला आवाज उठवावा असे आवाहन केले. इतिहासातील जिजाऊंच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी महिलांच्या योगदानाची जाणीव करून दिली.

तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे जयमंगल जाधव यांनी हिंदू संमेलनांची आवश्यकता आणि त्यामागील सामाजिक उद्दिष्टे यावर सखोल विचार मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोमाता पूजन करण्यात आले. एका बाल कलाकाराने बजरंगबलीची वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच गजानन खांडेभराड यांनी ‘वासुदेव’ या पारंपरिक भूमिकेतून परिसरात जनजागृती करत कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक समाधान घुगे यांनी केले. समारोप प्रसंगी भारत मातेची आरती करण्यात आली व उपस्थितांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक हिंदू समाज बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

विंचूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण अभिवादन

0
विंचूर (प्रतिनिधी उत्तम जाधव, योगेश कर्डिले) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विंचूर येथे...

लासलगाव व चांदवड आंदोलनानंतर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये बदल : आता बाजार समितीमध्येही खरेदीला...

0
लासलगाव निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : 4 जून 2026, लासलगाव व चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला...

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

विंचूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण अभिवादन

0
विंचूर (प्रतिनिधी उत्तम जाधव, योगेश कर्डिले) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विंचूर येथे...

लासलगाव व चांदवड आंदोलनानंतर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये बदल : आता बाजार समितीमध्येही खरेदीला...

0
लासलगाव निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : 4 जून 2026, लासलगाव व चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला...

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...
error: Content is protected !!