गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :गेवराई तालुक्यातील किनगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सरपंच रामप्रसाद चाळक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता, ज्यामुळे वातावरणात उत्साह आणि अभिमानाची भावना निर्माण झाली.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम जिजा चाळक, माजी सरपंच तात्यासाहेब चाळक, सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब चाळक, परमेश्वर चाळक, बाळासाहेब चाळक, राधाहरी चाळक, भगवानराव चाळक, नामदेव गायकवाड, रघुनाथ गायकवाड, अण्णासाहेब गायकवाड, शिवाजी गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, परसराम जागृत, अच्युत चाळक, मोहन चाळक, प्रल्हाद चाळक, भिवाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत संविधानिक मूल्यांनुसार आचरण करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे जयंती उत्सव शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.






















