Times of Maharashtra Desk : ऐन निवडणुकीच्या वेळी शिंदेना त्यांच्या उमेदवाराकडून मोठा धक्का बसला आहे. निवडणुका तोंडावर असताना शिंदेच्या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे.
जामनेर नगरपालिकेत भाजपा आणि शिंदेसेनेचे उमेदवार आमनेसामने आले होते. एकनाथ शिंदे यांच्याकडून वार्ड क्रमांक १ मध्ये मयुरी चव्हाण आणि वार्ड नंबर १३ मधून रेशंता सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. याठिकाणी वार्ड क्रमांक १ मध्ये सपना झाल्टे आणि वार्ड १३ मधून किलुबा लोकमान शेवाळे यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाहोता या वार्डात भाजपा-शिंदेसेना समोरासमोर लढत होते. गिरीश महाजनी हे शिंदे गटाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या प्रयत्नात होते आणि आता मतदानापूर्वीच गिरीश महाजनांनी मोठी खेळी यशस्वी झाल्याचे दिसत आहे. कारण शिंदेसेनेच्या २ उमेदवारांना अर्ज मागे घेत बीजेपी पक्षात प्रवेश केला आहे.
यात एकनाथ शिंदे यांचे खास अतुल सोनवणे यांच्या सह दोन महिलांनी अर्ज मागे घेत बीजेपी मध्ये प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश कार्यक्रम माजी नगर अध्यक्ष साधना महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला.मयुरी चव्हाण आणि रेशंता सोनवणे यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने भाजपाच्या सपना झाल्टे, किलुबाई शेवाळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे शिंदेच्या पक्षात नेमक चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुख्यमंत्र्याच आश्वासन खरं की खोट?
कालच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाचा एकही कार्यकर्ता बीजेपी मध्ये घेतला जाणार नाही असे आश्वासन दिले होते. परंतु अतुल सोनवणे, मयुरी चव्हाण आणि रेशंता सोनवणे त्यांच्या पक्षप्रवेशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन खरे आहे की खोटे असा प्रश्न पडला आहे.



















