Homeताज्या बातम्याआनंद मोरे प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी, लग्नाआधी मतदान! पानगावच्या नवरदेवाची कृती चर्चेत

आनंद मोरे प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी, लग्नाआधी मतदान! पानगावच्या नवरदेवाची कृती चर्चेत

Times Of Maharashtra Desk : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली असून, सकाळी 7 वाजल्यापासून मतदार केंद्रांवर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी ही निवडणूक होत असून, एकूण 7,438 उमेदवार रिंगणात आहेत. आज तब्बल 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

राज्याच्या विविध भागांमध्ये ग्रामीण मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांकडे धाव घेतल्याचं चित्र दिसत आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये आणि काही सरकारी कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगाव येथील एका नवरदेवाने लग्नाआधी मतदान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आनंद जयराम मोरे या नवरदेवाने घोड्यावरून निघालेली वरात थेट मतदान केंद्रात नेली आणि मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या या कृतीमुळे मतदार जागृतीचा संदेश दिला गेल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे, आनंद मोरे हे प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी (बीडीओ) म्हणून कार्यरत असून, विवाहासाठी गावी आले होते. बोहल्यावर चढण्याआधी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग महत्त्वाचा असल्याचा संदेश त्यांनी दिला.

या निवडणुकांसाठी सुरुवातीला 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्यामुळे मतदानाची तारीख बदलून आज, 7 फेब्रुवारी करण्यात आली. मतदान प्रक्रिया आज संध्याकाळी साडेपाचपर्यंत सुरू राहणार असून, 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकांमधून ग्रामीण भागातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!