Homeताज्या बातम्याबोरीवली-दहिसरमध्ये फेरीवाला कारवाईवर मनसेचा आक्षेप; ‘फक्त मराठी व्यापाऱ्यांनाच लक्ष्य, परप्रांतियांना संरक्षण’ असा...

बोरीवली-दहिसरमध्ये फेरीवाला कारवाईवर मनसेचा आक्षेप; ‘फक्त मराठी व्यापाऱ्यांनाच लक्ष्य, परप्रांतियांना संरक्षण’ असा आरोप

Times Of Maharashtra Desk : बोरीवली–दहिसर परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कारवाई करताना केवळ मराठी व्यापारी आणि फेरीवाल्यांनाच लक्ष्य केलं जात असून, इतर परप्रांतिय फेरीवाल्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. या कथित भेदभावाविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आर – मध्य प्रभाग कार्यालयात धडक देत प्रशासनाला जाब विचारला.

मनसेच्या वतीने आर-मध्य प्रभागातील सहाय्यक अभियंता कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. यावेळी प्रशासनाला निवेदन देत अतिक्रमणविरोधी कारवाईत दुजाभाव केला जात असल्याचा मुद्दा ठामपणे मांडण्यात आला. फक्त मराठी व्यापाऱ्यांवरच कारवाई केली जात असून, परप्रांतिय व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं जात असल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केला.

कारवाई करताना नियम सर्वांसाठी समान असावेत – मनसे
या आंदोलनावेळी मनसे नेते कुणाल माईनकर आणि उपविभाग प्रमुख किरण नकाशे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला. कारवाई करताना नियम सर्वांसाठी समान असावेत, कोणताही दुजाभाव चालणार नाही, अशी ठाम मागणी त्यांनी केली. अतिक्रमण हटवायचं असेल, तर ते सर्व फेरीवाल्यांवर एकसारखं झालं पाहिजे. फक्त मराठी व्यापाऱ्यांना लक्ष्य करणं अन्यायकारक असून ते आम्ही खपवून घेणार नाही, असं मनसे नेत्यांनी सांगितलं.

मनसेकडून अमराठी व परप्रांतिय फेरीवाल्यांवरही तात्काळ आणि समान कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा थेट इशाराही प्रशासनाला देण्यात आला.

प्रशासनाकडून दखल घेण्याचं आश्वासन
मनसेने दिलेल्या निवेदनानंतर प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली जाईल आणि नियमांनुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात समान कारवाई होत नाही तोपर्यंत मनसेची भूमिका आक्रमकच राहील, असंही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

या प्रकारामुळे बोरीवली–दहिसर परिसरातील फेरीवाला कारवाईचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, प्रशासनाची पुढील भूमिका काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!