Homeताज्या बातम्याIIT Bombay to IIT Mumbai Name Change Controversy: "आयआयटी बॉम्बे वादाला...

IIT Bombay to IIT Mumbai Name Change Controversy: “आयआयटी बॉम्बे वादाला नवे वळण: फडणवीस नावबदलाची मागणी करणार”

Times of Maharashtra Desk, Mumbai vs Bombay : केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या व्यक्तवामुळे निर्माण झालेला आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे ह्या वादाने आता नवीन वळण घेतले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई असे ठेवण्याची मागणी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.पूर्वी बॉम्बे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचे १९९५ मध्ये मुंबा देवीच्या सन्मानार्थ आणि ब्रिटिश वसाहतवादी राजवटीचा ठसा पुसण्यासाठी राज्य सरकारने अधिकृतपणे मुंबई असे नामकरण केले.आणि त्यानंतर सर्वांसाठी बॉम्बे मुंबई बनली.

“सुदैवाने, आयआयटी बॉम्बेचे नाव अजूनही तेच आहे. तुम्ही ते बदलून मुंबई केलेले नाही. तर तुमच्यासाठी ही आणखी एक प्रशंसा आहे. आणि मद्राससाठीही तेच खरे आहे. ते अजूनही आयआयटी मद्रास आहे.” केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या या वक्तव्यामुळे हा वाद उठला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक्स पोस्ट करत केंद्रीय मंत्र्यांच्या विधानावर निशाणा साधला होता. त्यात ते म्हणाले मराठी नेत्यांनी आणि जनतेने नेहमीच मराठी लोकांची असलेली मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कट उधळून लावला आहे.

“आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली त्यामुळे त्यांच्या हृदयात अनेक दशकांपासून असलेली कटुता आता पुन्हा समोर येत आहे.”मुंबईतील लोकांनी आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात राहणाऱ्या सर्व मराठी लोकांनी आता डोळे उघडले पाहिजेत.मुंबई हे नाव सत्ताधारी पक्षाला त्रास देते कारण ते मुंबईच्या देवी मुंबा देवी यांच्या नावावरून ठेवले आहे. तिचे वंशज मराठी लोक आहेत जे पिढ्यानपिढ्या येथे राहत आहेत. ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकारने पंजाबच्या ताब्यातून चंदीगड हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर सर्व पक्षांच्या विरोधानंतर ते मागे हटले. ते म्हणाले की, ही माघार तात्पुरती होती.”मुंबईच्या बाबतीतही असेच काहीतरी सुरू आहे. शहरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच होत आहे. प्रथम मुंबई आणि नंतर संपूर्ण एमएमआर प्रदेश ताब्यात घेऊन गुजरातमध्ये विलीन केला जाईल. मराठी लोकांनी जागे व्हावे.” असे म्हणत त्यांनी संतप्त भूमिका मंडळी होती. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाव बदलण्याच्या भूमिकेमुळे या वादाला आता नवीन वळण मिळाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या व्यक्तव्याने खरंच आयआयटी बॉम्बे ही नाव बदलून आयआयटी मुंबई होणार का? केंद्र सरकारचा या वर काय निर्णय असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!