Homeउद्योगभारत–अमेरिका व्यापार करारावर शिक्कामोर्तब; अमेरिकेचे शुल्क २५ % वरून १८% पर्यंत कमी.

भारत–अमेरिका व्यापार करारावर शिक्कामोर्तब; अमेरिकेचे शुल्क २५ % वरून १८% पर्यंत कमी.

Times Of Maharashtra Desk : भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार संबंधांना नवे बळ देणाऱ्या महत्त्वपूर्ण व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधल्यानंतर या कराराची माहिती दिली. या करारानुसार, अमेरिका भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क २५  टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करणार आहे.या घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले.

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार

“आज माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधणे अत्यंत आनंददायी होते. ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांवर आता १८ टक्के शुल्क आकारले जाणार असल्याचा मला विशेष आनंद आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भारताच्या १.४ अब्ज जनतेच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मनापासून आभार,” -पंतप्रधान नरेंद्र मोदी

जेव्हा जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि सर्वात मोठ्या लोकशाही एकत्र काम करतात, तेव्हा त्याचा थेट फायदा दोन्ही देशांच्या जनतेला होतो. परस्पर सहकार्यासाठी यामुळे मोठ्या संधी निर्माण होतील. जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण असून शांततेसाठी त्यांच्या प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा आहे.असे मतही त्यांनी व्यक्त केले.

व्यापार करारावर परस्पर सहमती

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या कराराबाबत सोशल मीडियावर सविस्तर निवेदन जारी केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विनंतीवरून आणि परस्पर मैत्रीच्या नात्यावर आधारित भारत–अमेरिका व्यापार करारावर सहमती झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. या करारानुसार, अमेरिका भारतावरील परस्पर शुल्क २५  टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करेल, तर भारत अमेरिकेवरील शुल्क तसेच नॉन-टॅरिफ अडथळे शून्यावर आणण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.याशिवाय, ट्रम्प यांनी असा दावाही केला की भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवून अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून तेल आयात करण्याचा विचार करेल.

मोदी–ट्रम्प दूरध्वनी संवाद

सोमवारी झालेल्या दूरध्वनी संभाषणात दोन्ही नेत्यांनी व्यापारासह विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. या चर्चेनंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले  हा माझ्यासाठी सन्मान होता. ते माझे अत्यंत जवळचे मित्र असून त्यांच्या देशातील एक शक्तिशाली आणि आदरणीय नेते आहेतअसे म्हटले आहे . या व्यापार करारामुळे भारत–अमेरिका संबंध अधिक दृढ होतील आणि दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!