जळगाव (प्रतिनिधी : विनोद सुधाकर पवार): महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशाबद्दल मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना गौरविण्यात आले. यावेळी मंत्री आशिष शेलार उपस्थित होते.
भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) मार्फत या कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यात आले. जळगाव जिल्हा प्रशासनाने २०० पैकी तब्बल १८८ गुण मिळवत राज्यात अव्वल स्थान मिळवले. प्रशासनातील पारदर्शकता, डिजिटल कामकाजाची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकाभिमुख सेवा यामुळे जिल्ह्याने हे यश संपादन केले.
या यशामागे सात महत्त्वाची सूत्रे निर्णायक ठरली. त्यामध्ये अधिकाऱ्यांसाठी स्पष्ट उद्दिष्टे व मूल्यमापन, ‘आपले सरकार’ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय कामकाजात ई-ऑफिसचा १०० टक्के वापर, कामकाजाच्या देखरेखीसाठी डिजिटल डॅशबोर्ड, नागरिकांसाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे सेवा, एआय व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर तसेच जीआयएस प्रणालीद्वारे योजनांची अंमलबजावणी या बाबींचा समावेश आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, “हे यश जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचे फलित आहे. नागरिकांना जलद, पारदर्शक व प्रभावी सेवा देण्याच्या उद्दिष्टाने आम्ही सातत्याने काम केले. जिल्हा प्रशासनाचे हे यश संपूर्ण जळगावकरांना समर्पित आहे.”
जळगाव जिल्ह्याच्या या यशामुळे प्रशासनिक कार्यक्षमता आणि डिजिटल परिवर्तनातील प्रगती अधोरेखित झाली असून, राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी हा एक आदर्श ठरत आहे.
ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल : रोहन घुगे यांचा मुंबईत गौरव
RELATED ARTICLES
- Advertisment -
बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...
राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...
ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...
वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....
ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...
बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...
राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...
ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...
वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....
ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...






















