Homeटेक्नॉलॉजीई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल : रोहन घुगे यांचा मुंबईत...

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल : रोहन घुगे यांचा मुंबईत गौरव

जळगाव (प्रतिनिधी : विनोद सुधाकर पवार): महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशाबद्दल मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना गौरविण्यात आले. यावेळी मंत्री आशिष शेलार उपस्थित होते.
भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) मार्फत या कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यात आले. जळगाव जिल्हा प्रशासनाने २०० पैकी तब्बल १८८ गुण मिळवत राज्यात अव्वल स्थान मिळवले. प्रशासनातील पारदर्शकता, डिजिटल कामकाजाची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकाभिमुख सेवा यामुळे जिल्ह्याने हे यश संपादन केले.
या यशामागे सात महत्त्वाची सूत्रे निर्णायक ठरली. त्यामध्ये अधिकाऱ्यांसाठी स्पष्ट उद्दिष्टे व मूल्यमापन, ‘आपले सरकार’ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय कामकाजात ई-ऑफिसचा १०० टक्के वापर, कामकाजाच्या देखरेखीसाठी डिजिटल डॅशबोर्ड, नागरिकांसाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे सेवा, एआय व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर तसेच जीआयएस प्रणालीद्वारे योजनांची अंमलबजावणी या बाबींचा समावेश आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, “हे यश जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचे फलित आहे. नागरिकांना जलद, पारदर्शक व प्रभावी सेवा देण्याच्या उद्दिष्टाने आम्ही सातत्याने काम केले. जिल्हा प्रशासनाचे हे यश संपूर्ण जळगावकरांना समर्पित आहे.”
जळगाव जिल्ह्याच्या या यशामुळे प्रशासनिक कार्यक्षमता आणि डिजिटल परिवर्तनातील प्रगती अधोरेखित झाली असून, राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी हा एक आदर्श ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!