Times of Maharashtra Desk: काही दिवसांपासून महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. काही भागात हाड गोठणारी थंडी पासली आसतान आता हवामान बदलणार असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. २१ ते २४ नोव्हेंबर पर्यन्त राज्यातील काही भागात वातावरण ढगाळ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता असून काही भागात हलका पाऊस पडू शकतो असा हवामान तज्ञांचा आंदज आहे.
काही दिवसांपासून राज्यात प्रचंडि थंडी पडत आहे. काही ठिकाणी तापमान आगदी ७ अंश च्या खाली नोंदवले आहे. आणि आता अचानक हवामतील ह्या बदलामुळे आणखीन थंडी जांवण्याची शक्यता आहे. तसेच या अमोसमी पाऊसामुळे अजारांना खुले आमंत्रण मिळणार असून महाराष्ट्रातील हवामान चक्र काही दिवस फिरण्याची शक्यता आहे.
जेष्ठ हवामान तज्ञ अनुपम काश्यपी यांनी सांगितल्या प्रमाणे बुधवार पासून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिण आणि मद्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ होऊन २१ ते १४ नोव्हेंबर दरम्यान रत्नागिरी, सांगली , सोलापूर, कोल्हापूर , सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पुस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्मिती होत असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे हवामानावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह काही काळासाठी खंडित होऊन थंडीची तीव्रता कमी होऊ शकते.
तर परिणामी पवसानंतर जास्त थंडी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.






















