Times of Maharashtra Desk: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोचक शब्दात टीका केली आहे.एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन पक्षा विरुद्धची नाराजगी व्यक्त केली होती. यावर भाष्य करत “एक कोणतरी गेलं, बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला.ही लाचारी चांगला शिक्षक मिळाला असता तर आली नसती. तांदळातून खडे निवडायचे का खड्यातून तांदूळ हे शिकवण्याचं काम शिक्षकांचंच आहे”, अशी जाणीव प्रत्येक पिढीला करून देणे गरजेचे असा टोला मारला आहे.
शिक्षण नसेल तर राजकारण फक्त तोडाफोडिच असत – उद्धव ठाकरे.
एकनाथ शिंदेवर आक्रमक टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले ” दिवट्याना मशालीच महत्व काळात नाही, शिक्षण नसेल तर राजकारण फक्त तोडाफोडिच्या भोवऱ्यात अडकत. पुढे त्यांनी आमदार निधी बद्दल भाष्य करत तुमचा निधी असेल तो फक्त शिक्षणासाठीच वापरा.” “मुलांना तयार करण्याची जबाबदारीच नाही. पक्ष फोडायचे, आमदार-खासदार उडवायचे, खुर्ची मिळाली की बाकीचं जग खड्यात!” पुढे त्यांनी त्यांचे आजोबा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शाळा सोडण्याच्या प्रसंगाचा उल्लेख करत “शाळा सुटली तरी त्यांचं शिक्षण थांबलं नाही. संस्कारांचं मोल त्यांना माहिती होतं.” मुलांमध्ये येणारे संस्कार पालकांच्या वर्तनातूनच घडतात. “आपली अक्षरं आईने हात धरून गिरवली म्हणूनच तिला मातृभाषा म्हणतो.” असे म्हणत त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शिवसेनेच्या जुन्या आठवणींची उजळणी “घरात काहीच नाही, मुलींना शिकवायचं कसं?” या कुटुंबाची जबाबदारी शिवसेनेने घेतली होती”
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. मागचे काही वर्ष बघितले तर मुंबईमहानगर पालिकेचा नक्की बाप कोण? असा प्रश्न मला पडला आहे. मात्र, शिवसेनेच्या कार्यकाळात महापालिका शाळांमध्ये झालेले बदल मला आठवतात. “आदित्यच्या कामामुळे पहिल्यांदाच महापालिका शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागल्या.” दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासरूमची संकल्पना मांडत त्यांनी “एक चांगला शिक्षक स्टुडिओतून सर्व शाळांना शिकवू शकतो,” ही तेव्हा सर्वाना शिवसेनेने समजवले. मुंबईतच नाही मराठवाड्यात देखील “मुलींचं शिक्षण फुकट आहे म्हणतात, पण फी भरायला पैसे नाहीत. घरात काहीच नाही, मुलींना शिकवायचं कसं?” या कुटुंबाची जबाबदारी शिवसेनेने घेतल्याचेही त्यांनी सांगितले.






















