Times of Maharashtra Desk, Rashtrvadi vs BJP:: तळेगाव- दाभाडे प्रभागतील राजकारण चांगलेच तापले आहे.तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या युतीतील नेत्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. दोन्ही पक्षांमध्ये नाराजी वाढली असून अनेक इच्छुक उमेदवार, निष्ठावंत कार्यकर्ते आणि बंडखोर यांच्यातील मतभेद वाढत चालला असून त्यामुळे येथीत राजकारण तणावात आहे . हे सर्व थंड करण्याच्या प्रयत्नात युतीचे नेते आणि कोअर कमिटी पूर्णपणे त्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
बंडखोर उमेदवारांना शांत करण्याचे प्रयत्न अपयशी ठरत असल्याने युतीच्या नेत्यांची चिंता वाढली. बुधवारी उशिरापर्यंत यासाठी जोरदार हालचाली सुरू होत्या. उद्या 21 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आज दुपारी 12 वाजता तातडीची पत्रकार परिषद बोलावली होती. पण ती काही कारणावरून रद्द करावी लागली.
याबाबद शहरअध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी सांगितले की “ही युती टिकवी म्हणून आमचे शेवटचे पर्यन्त सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाअध्यक्ष गणेश खांडगे यांच्याशी संपर्क करण्याचा आम्ही पर्यन्त आम्ही करत आहोत. त्यांच्याशी संपर्क होताच ह्या युतीबाबाद निर्णय घेतला जाईल. आता ही युती टिकणार की मोडणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.






















