Homeताज्या बातम्याOBC reservation: आरक्षण वाद सर्वोच्च न्यायालयात; ओबीसी नेत्यांची निवडणुकांवरील स्पष्ट भूमिका

OBC reservation: आरक्षण वाद सर्वोच्च न्यायालयात; ओबीसी नेत्यांची निवडणुकांवरील स्पष्ट भूमिका

Times of Maharashtra Desk,OBC reservation: राज्यातील आगामी निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. एकीकडे निवडणूक आयोग ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात गुंतलेली आहे. २ डिसेंबरला मतदान असून लगेच ३ डिसेंबरला निकल जाहीर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून ओबीसी आरक्षण प्रश्नी आज पुन्हा एकदा या याचिकांवर सुनावणी पार पडली आहे तर पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
आजच्या सुनावणीत कोणताही निर्णय कोर्टाने घेतला नाही. त्यामुळे, आता शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या जाहीर झालेल्या निवडणुकाचं काय होणार, असा प्रश्न सर्वाना पडला आहे. सध्या चालू असलेल्या सुनावणीवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आपली प्रतीक्रिया व्यक्त केली आहे.

नेमक प्रकरण काय?
विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेत काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा अनुपात घटनात्मक 50 टक्के मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात आला आहे, जे कायद्याच्या विरोधात आहे असा दावा केला होता. मात्र, बांठिया आयोगाच्या अहवालाचा संदर्भ घेत आरक्षणाची रचना योग्य पद्धतीने करण्यात आली आहे, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.हे. त्यामुळे, आरक्षणाची ही लढाई आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.

काय म्हणाले ओबीसी नेते प्रकाश शेंडगे? 

राज्यात सध्या नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे, कायद्यातील आर्टिकल 231 बी नुसार प्रक्रिया सुरू झालेल्या निवडणुका थांबवता येत नाहीत. त्यामुळे, मला वाटतय नगरपालिका नगरपरिषद निवडणुका पार पडतील. केवळ, जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत मात्र कोर्ट काहीतरी निर्णय घेईल, आम्ही ओबीसी उमेदवार निवडणुकीत उतरवत आहोत, आम्ही लढाई सोडणार नाही असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले. तसेच बांठिया आयोगाबाबत आम्हाला आक्षेप आहेत. बांइंदिरा सिंग या वकिलांनी न्यायालयात ओबीसींची बाजू चांगली लावून धरली. सध्या आरक्षणाचा विषय आदिवासी जिल्ह्यांमध्ये निर्माण झाला आहे. न्यायाधीश खानविलकर यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील निवडणुका बाँटिया आयोगाच्या आधी जे आरक्षण होतं त्यानुसार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या अशी माहिती देखील त्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...
error: Content is protected !!