Times of Maharashtra Desk, Labor Laws: भारतातील अनेक कामगार कायदे स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणजेच 1930 ते 1950 च्या काळातील आहेत.सध्या बदलत्या जगासोबत अर्थव्यवस्था व न्यायवेवस्था बदलणे देखील गरजेचे आहे . त्यामुळे आजपासून देशात नवीन ४ नव्या श्रम संहिता लागू होणार आहेत अशी घोषणा केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी केली. या चार संहितांमध्ये द कोड ऑन वेजेस 2019, द इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड २०२० , द कोड ऑन सोशल सिक्युरिटी २०२०आणि द ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड २०२० यांचा समावेश असणार आहे. सध्या भारतात २९ कायदे लागू असून त्यातील सुधारणांसाठी या संहिता लागू करण्यात आल्या आहेत. श्रममंत्री मनसूख मांडवीय यांच्या म्हणण्यानुसार नव्या लेबर कोडमुळं आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सोपी करण्यासाठी ही बदल करण्यात येत आहेत.
याचे फायदे कोणते?
नवीन लागू झालेल्या संहिते नुसार सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी मिळणार आहे.युवकांना नियुक्ती पत्र मिळण्याची हमी मिळेल. महिलांना देखील समान कामासाठी समान वेतन आणि सन्मानाची हमी देण्यात येणार आहे , 40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमी मिळेल. तर निश्चित कर्मचाऱ्यांना एका वर्षाच्या कालावधीनंतर ग्रॅच्युईटीची गॅरंटी मिळेल. आणि 40 वर्षांच्यावरील श्रमिकांना दरवर्षी मोफत आरोग्य तपासणीची गॅरंटी मिळेल. ओव्हरटाईम केल्यास दुप्पट वेतनाची गॅरंटी, जोखीम असलेल्या क्षेत्रातील कामगारांना 100 टक्के आरोग्य सुरक्षेची गॅरंटी, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार श्रमिकांना सामाजिक न्यायाची गॅरंटी मिळणार आहे.
हे बदल नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रमिकांच्या कल्याणासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे.- श्रममंत्री मनसूख मांडवीय
नवीन संहिते बद्दल सांगताना श्रममंत्री मनसूख मांडवीय म्हणाले नव्या सुधारणा आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असून विकसित भारत 2047 चं ध्येय गाठण्यासाठी नवी गती देईल, तर हे बदल नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रमिकांच्या कल्याणासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे. या नव्या संहिते मुळे कामगार आणि उद्योगांना प्रोत्साहन मिळेल अशी आम्हाला आशा आहे.






















