Homeमहत्त्वाचेविधानपरिषदेतील रिक्त जागांवर लवकरच निर्णय; जो पक्षासाठी राबला त्यालाच मिळणार संधी.

विधानपरिषदेतील रिक्त जागांवर लवकरच निर्णय; जो पक्षासाठी राबला त्यालाच मिळणार संधी.

Times Of Maharashtra Desk:महाराष्ट्र विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील पाच रिक्त जागा भरण्याच्या हालचालींना वेग आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या नियुक्त्यांमध्ये प्राधान्य दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या पाच जागांवर नेमकी कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विधानपरिषद- यांचा कार्यकाल १३ मे रोजी संपणार. 

महाराष्ट्र विधानपरिषद ही कायमस्वरूपी सभागृह असून तिची एकूण सदस्यसंख्या ७८ आहे. सध्या ५५ सदस्य कार्यरत असून २३ जागा रिक्त आहेत. दरम्यान, १४ मे २०२६ रोजी आणखी ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. या जागा विधानसभेतील आमदारांकडून निवडून दिलेल्या सदस्यांच्या आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे. त्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार आहे.

सध्या विधानसभेत २८६ आमदार असल्यामुळे या निवडणुकीत अंदाजे ३६ आमदारांचा मतदानाचा कोटा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विविध पक्षांकडून राजकीय गणिते मांडली जात आहेत.

विधानपरिषदेच्या रचनेनुसार, ७८ सदस्यांपैकी ३० सदस्य विधानसभेतील आमदारांकडून निवडले जातात. २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून निवडले जातात. शिक्षक मतदारसंघातून ७, पदवीधर मतदारसंघातून ७ सदस्य निवडले जातात, तर साहित्य, कला, सहकार आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील १२ सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.
राज्यसभा – यांचा कार्यकाल संपणार!
दरम्यान, राज्यसभेच्याही निवडणुकीचे गणित रंगू लागले आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकूण ७ जागा २ एप्रिल २०२६ रोजी रिक्त होणार आहेत. यात शरद पवार, रामदास आठवले , भागवत कराड, धैर्यशील पाटील  प्रियंका चतुर्वेदी , रजनी पाटीलआणि फौजिया खान  यांचा समावेश आहे.

विधानपरिषद आणि राज्यसभा या दोन्ही पातळ्यांवरील रिक्त जागांमुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता असून, विविध पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चुरस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संतोष भंडारी , केशव पंडितांच्या अटकेसाठी

0
गेवराई तालुका (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  ठेवीदार कलेक्टर व एसपी कार्यालयात धडकले गेवराई, दि.१८(प्रतिनिधी )_ १६ एप्रिल रोजी गेवराई येथील विविध क्रेडिट सोसायटी व...

आवळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात;५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप,

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज...

सुशी येथे ३९ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

0
 गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  तालुक्यातील सुशी येथे आयोजित ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प....

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

संतोष भंडारी , केशव पंडितांच्या अटकेसाठी

0
गेवराई तालुका (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  ठेवीदार कलेक्टर व एसपी कार्यालयात धडकले गेवराई, दि.१८(प्रतिनिधी )_ १६ एप्रिल रोजी गेवराई येथील विविध क्रेडिट सोसायटी व...

आवळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात;५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप,

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज...

सुशी येथे ३९ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

0
 गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  तालुक्यातील सुशी येथे आयोजित ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प....

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...
error: Content is protected !!