Homeमहाराष्ट्रगटई स्टॉल योजनेंतर्गत कामगारांना 100 टक्के अनुदानावर स्टॉल

गटई स्टॉल योजनेंतर्गत कामगारांना 100 टक्के अनुदानावर स्टॉल

28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ प्रतिनिधी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘गटई स्टॉल योजना’ अंतर्गत सन 2025-26 या वर्षासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. चर्मकार, ढोर, होलार, मोची आदी समाजघटकांचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक जीवनमान उंचावून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने ही योजना सन 1997 पासून कार्यान्वित आहे.

या योजनेंतर्गत महानगरपालिका, नगरपालिका, छावणी क्षेत्र तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील पात्र गटई कामगारांना 100 टक्के शासकीय अनुदानावर लोखंडी पत्र्याचे स्टॉल देण्यात येणार असून त्यासोबतच ५ हजार रुपयांचे रोख अनुदानही प्रदान करण्यात येणार आहे.

पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे :

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.

ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 80 हजार रुपयांपर्यंत, तर शहरी भागातील उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असावे.

अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.

ज्या जागेसाठी स्टॉलची मागणी केली आहे ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका किंवा छावणी बोर्डाकडून अधिकृतरित्या भाडे, करार, खरेदी किंवा मोफत ताब्यात दिलेली अथवा अर्जदाराच्या स्वमालकीची असणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील पात्र व गरजू गटई कामगारांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, पळसवाडी कॅम्प, यवतमाळ येथून अर्ज विनामूल्य प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.

ही योजना गरजू कामगारांसाठी आर्थिक स्वावलंबनाची मोठी संधी ठरणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!