विष्णू गायकवाड (गेवराई तालुका प्रतिनिधी ) : ‘मेरा युवा भारत’ बीड अंतर्गत रंगार चौक, गेवराई येथील विमला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात निबंध स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. बीड जिल्हा युवा अधिकारी सत्यजित संतोष यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि वैचारिक विकासाला चालना देणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमास प्रकाश त्रिभुवन (जिल्हा समन्वयक, मेरा युवा भारत, छत्रपती संभाजीनगर), कडुदास कांबळे (प्रदेश समन्वयक, महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समिती), पांडुरंग खरात (गेवराई तालुका समन्वयक, मेरा युवा भारत) तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश त्रिभुवन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मुख्याध्यापक के. जी. जोगदंड यांचे विशेष सहकार्य लाभले.

स्पर्धेसाठी ‘सुभाषचंद्र बोस’, ‘विजयी दिवस’ आणि ‘माझ्या स्वप्नातील भारत’ हे विषय देण्यात आले होते. इयत्ता ८वी व ९वीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. मार्गदर्शन करताना कडुदास कांबळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, लेखनकौशल्य व देशप्रेम जागृत करण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या असल्याचे सांगितले.
निकालात ८वी वर्ग : प्रथम : कु. काव्या अमोल कानपुरे द्वितीय : कु. वेदिका सुदर्शन वाईकर तृतीय : चि. वेद प्रमोद आमलेकर ९वी वर्ग : प्रथम : कु. ऋतिका लहू म्हेत्रे द्वितीय : कु. गौरी दादासाहेब खडके तृतीय : कु. ऋतिका सुदर्शन खुणे. विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन नरेंद्र कुलकर्णी यांनी केले. समारोपप्रसंगी मुख्याध्यापक जोगदंड यांनी ‘मेरा युवा भारत’च्या उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही अशा स्पर्धा आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. परीक्षक म्हणून जवंजाळ के. एस., जिरेवाड सुनील मारुतीराव व घुगे एस. एस. यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व पालकांची लक्षणीय उपस्थिती होती.






















