Homeताज्या बातम्यामौजा भूज येथे 'मुजरा माझ्या लावणीचा' कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन

ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला मंडळ, भूज यांच्या वतीने आयोजित “मुजरा माझ्या लावणीचा” हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लढाऊ नेते कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे युवा नेते तनय देशकर होते. तर सहउद्घाटक म्हणून वांद्रा येथील उपसरपंच गुरुदेव वाघरे आणि प्रा. सुयोग बालबुद्धे उपस्थित होते. याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष तथा उपसरपंच सुरेश ठिकरे, माजी सरपंच मोरेश्वर पाटील झोडे, सत्कारमूर्ती नानेश्वर दिवटे, सरपंच शालूताई रामटेके, पोलीस पाटील देवानंद झोडे, विलास गहाने, नंदूजी म्हस्के सर, माणिक पाटील थेरकर, पुंडलिक पाटील झोडे, गणेश वाघरे, वांद्रा येथील माजी उपसरपंच बाबुराव सातपुते, सुधीर पाटील खेवले, इंजिनिअर अविनाश म्हस्के, चंद्रभान खनखापरे, मुखरु पाटील झोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

लावणी ही महाराष्ट्राची शान: विनोद झोडगे उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना कॉम्रेड विनोद झोडगे यांनी लोककलेचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले की, “लावणी ही आपल्या महाराष्ट्राची आण, बाण आणि शान असून ती संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ही लोककला आणि आपली परंपरा जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून केवळ मनोरंजनच होत नाही, तर स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळते आणि त्यांच्या कलागुणांना चालना मिळते.” तसेच, अशा कार्यक्रमांतून सामाजिक एकात्मता वृद्धिंगत होते, त्यामुळे सर्वांनी अशा उपक्रमांना पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मंडईनिमित्त आयोजित या लावणीच्या कार्यक्रमाचा भूज आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवतरुण कला मंडळ, भूजच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...
error: Content is protected !!