Homeताज्या बातम्यामुळशी तालुक्यात अनधिकृत उत्खनन प्रकरणात सरकारी पंचनाम्यात अडथळा; संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी

मुळशी तालुक्यात अनधिकृत उत्खनन प्रकरणात सरकारी पंचनाम्यात अडथळा; संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी

Times of Maharashtra Desk: मुळशी तालुक्यातील मौजे भादस बुद्रुक येथील सर्वे नं. १७२ मधील अनधिकृत माती उत्खनन प्रकरणाच्या पुनर्पंचनाम्यादरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

सन २०२३ मध्ये सदर ठिकाणी झालेल्या अनधिकृत उत्खननासंदर्भात दिनांक १५ मे २०२३ रोजी गावकामगार तलाठी यांनी पंचनामा केला होता. त्यानंतर तहसीलदार मुळशी यांनी उत्खननास जबाबदार असलेल्या व्यक्तीकडून सुमारे १० लाख ६८ हजार रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते.मात्र या प्रकरणात संदीप ज्ञानोबा जोरी यांचे नाव चुकीच्या पद्धतीने आदेशात समाविष्ट झाल्याचा आरोप करण्यात आला. जोरी यांनी आपण संबंधित जागेचे उत्खनन केलेले नसल्याचे पुरावे सादर केल्यानंतर प्रकरण पुनर्वलोकनासाठी उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी यांनी आदेश दिले.

त्याअनुषंगाने दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी मंडल अधिकारी सावरगाव, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेर पंचनामा सुरू असताना संतोष विठ्ठल जोरी हे घटनास्थळी आले. संबंधित व्यक्तीचा त्या जमिनीशी कोणताही कायदेशीर संबंध नसताना त्यांनी पंचनाम्यात हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे.तक्रारीनुसार, संतोष जोरी यांनी पंचनाम्यादरम्यान संदीप जोरी यांच्याशी धक्काबुक्की व शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा आणला, त्यामुळे पंचनामा थांबवावा लागला. यामुळे शासकीय प्रक्रियेला अडथळा निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

1) या घटनेबाबत संदीप जोरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून,

2) सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा,

3) भविष्यात शासकीय अधिकारी व नागरिकांना संरक्षण मिळेल अशी कार्यवाही करावी,

4) संबंधित व्यक्तीला घटनास्थळी कोणी व कोणत्या हेतूने बोलावले याची स्वतंत्र चौकशी करावी,
अशी मागणी केली आहे.

प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रशासन पुढील काय कारवाई करते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!