Homeताज्या बातम्यावॉर्ड 173 मध्ये भाजप–शिंदे सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने; ‘50 खोके’ घोषणांनी वातावरण तापले

वॉर्ड 173 मध्ये भाजप–शिंदे सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने; ‘50 खोके’ घोषणांनी वातावरण तापले

Times of Maharashtra Desk: छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यानंतर आता मुंबईतही भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यातील अंतर्गत वितुष्ट उघडपणे समोर आले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक 173 मध्ये शुक्रवारी भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते थेट आमनेसामने आल्याची घटना घडली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.वॉर्ड 173 मध्ये भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या पूजा कांबळे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत सुरु आहे. आज सकाळी प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी जमल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी माईकवरून ‘50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्याने वातावरण चांगलेच तापले.

आतापर्यंत ठाकरे गटाकडून या घोषणांचा वापर शिंदे गटावर टीका करण्यासाठी होत होता. मात्र, मित्रपक्षातील भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनच अशा घोषणा दिल्या गेल्याने शिंदे सेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनीही भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिले. हा सगळा प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना घडलेल्या या घटनेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.दरम्यान, शिवसेना-भाजप जागावाटपात वॉर्ड क्रमांक 173 शिंदे सेनेला सुटला होता. त्यानुसार शिवसेनेने पूजा कांबळे यांना उमेदवारी दिली. मात्र भाजपच्या शिल्पा केळुस्कर यांनी भाजपचा कलर झेरॉक्स असलेला एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे त्यांचा अर्ज वैध ठरल्याने शिंदे गटाला नाईलाजाने या वॉर्डमध्ये मैत्रीपूर्ण लढतीला सामोरे जावे लागले. प्रचार सुरू होताच ही ‘दोस्तीतली कुस्ती’ उघडपणे समोर आली आहे.

या प्रकरणावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “भाजपचे कोण महारथी आहेत ते पाहावे लागेल. अशा घोषणा देण्याआधी देवेंद्र फडणवीस यांना विचारावे. आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात. या प्रकाराची फडणवीस यांनी दखल घ्यावी,” अशी मागणी शिरसाट यांनी केली. दरम्यान, भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिंदे सेनेचे वरिष्ठ नेते या वादावर काय तोडगा काढतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!