Homeताज्या बातम्यामहापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; दगडू सकपाळ–एकनाथ शिंदे मध्यरात्री भेटीने...

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; दगडू सकपाळ–एकनाथ शिंदे मध्यरात्री भेटीने खळबळ

Times of Maharashtra Desk: महापालिका निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटाच्या शिवसेनेसमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. अशातच ठाकरे गटाचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दगडू सकपाळ यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या भेटीमुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ वॉर्ड क्रमांक 203 मधून ठाकरे गटाकडून मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक होती. मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी न देता भारती पेडणेकर यांना उमेदवारी दिल्याने सकपाळ नाराज असल्याची चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर मतदान अवघ्या काही दिवसांवर असताना एकनाथ शिंदे यांनी केलेली भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

या भेटीवर स्पष्टीकरण देताना दगडू सकपाळ म्हणाले की, “मी आजारी आहे, ही बाब कळाल्यानंतर माझी प्रकृती विचारण्यासाठी एकनाथ शिंदे आले होते. यामागे दुसरा कोणताही राजकीय हेतू नाही. त्यांच्या सोबत राणेंचे चिरंजीव आणि देवरांचे चिरंजीवही उपस्थित होते.”दरम्यान, पक्षातील नाराजी स्पष्ट करताना सकपाळ म्हणाले, “जोपर्यंत गरज होती तोपर्यंत पक्षासाठी काम केलं. आता गरज संपली आहे, त्यामुळे पक्षाकडून विचारणाही होत नाही. किमान एक फोन आला असता तरी समाधान झालं असतं. पण पक्षाकडून कोणतीच दखल घेतली जात नसेल तर घरी बसलेलं बरं.”

तसेच त्यांनी स्पष्ट केलं की, “मी पक्षाबाबत नाराज आहे, पण मातोश्रीबाबत काहीही बोलणार नाही. जे काही मिळालं ते त्यांच्या आशीर्वादामुळेच. मी फक्त मुलीसाठी एक जागा मागितली होती. पवारांच्या राष्ट्रवादीला 11 जागा दिल्या, त्यांनी कधी पक्षासाठी रक्त सांडलं आहे का, अशी खंत आहे.”भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत बोलताना दगडू सकपाळ यांनी सध्या तरी कुठेही जाण्याचा विचार नसल्याचं सांगितलं. मात्र, “कुणाला गरज वाटली तर पुढे विचार करू,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!