Homeताज्या बातम्यासोशल मीडियावर लाखो चाहत्यांची पसंती; मात्र निवडणुकीत माजी सरपंच निर्मला नवले यांचा...

सोशल मीडियावर लाखो चाहत्यांची पसंती; मात्र निवडणुकीत माजी सरपंच निर्मला नवले यांचा पराभव

Times Of Maharashtra Desk : पुणे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता, लाखो चाहत्यांचा पाठिंबा आणि वेगळी स्टाईल असूनही शिरुर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या निर्मला नवले यांचा भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी अवघ्या ३०० मतांनी पराभव केला.

शिरुर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गणातून ही लढत झाली. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या निर्मला नवले यांची जादू यावेळी मतपेटीपर्यंत पोहोचू शकली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

निर्मला नवले या सोशल मीडियावरील त्यांच्या रिल्स, व्हिडीओ आणि वेगळ्या अंदाजामुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याकडे आणि कृतीकडे चाहत्यांचे लक्ष असते. इंस्टाग्रामवर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स असून त्यांचे अनेक व्हिडीओ आजवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीतही त्या बाजी मारतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

निर्मला नवले यांनी आयटी इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेतले असून काही वर्षांपूर्वी त्या कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली. उच्चशिक्षित, आत्मविश्वासू आणि आधुनिक विचारांची नेत्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. मात्र, या वेळी मतदारांनी वेगळा कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण २९९ जागांपैकी ७३ जागांचे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे २७, भाजपचे २०, शिवसेनेचे ७, ठाकरे गटाचे २ आणि शरद पवार गटाचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत.

अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार मोठ्या प्रमाणावर थंडावला होता. कोणतीही मोठी सभा झाली नव्हती. मात्र, या पार्श्वभूमीवरही पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला काही प्रमाणात सहानुभूती मिळताना दिसत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि प्रत्यक्ष निवडणूक यामधील फरक पुन्हा एकदा या निकालातून स्पष्ट झाल्याची चर्चा आता सर्वत्र होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!