Homeताज्या बातम्या'महा'शपथविधी सोहळ्यात फक्त ३ नेतेच शपथ घेणार; मंत्रिपदासाठी इच्छुक वेटिंगवर

‘महा’शपथविधी सोहळ्यात फक्त ३ नेतेच शपथ घेणार; मंत्रिपदासाठी इच्छुक वेटिंगवर

मुंबई :- महाराष्ट्रात आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा होणार असून यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

इतक्या मोठ्या सोहळ्यात राज्याचे ३ नेतेच शपथ घेणार असून अद्याप मंत्रि‍पदासाठी इच्छुक असलेल्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.

याबाबत माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील म्हणाले की, आज तिघांचा शपथविधी होईल जे निश्चित झालं आहे. २ उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री हे शपथ घेतील. त्यानंतर पुढच्या २ दिवसांनी ७ आणि ८ डिसेंबरला विधानसभेत आमदारांचा शपथविधी होणार आहे. त्यानंतर अध्यक्षांची निवड होईल. अजितदादांनी आमदारांना सूचना दिल्यात २ दिवसात शपथविधी उरकायचा आहे. पंतप्रधान मोदींचं शेड्युल्ड, किती मंत्र्‍यांनी शपथ घ्यायची हे सर्व विचार करूनच निर्णय घेतला जाईल. आमदारांचा शपथविधीही महत्त्वाचा आहे. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळातील इतर सदस्यांचा शपथविधी होईल असं त्यांनी सांगितले.

तसेच कुठलेही आमदार नाराज नाही. मंत्रिमंडळात कुणाला मंत्रि‍पदाची शपथ मिळणार हेच माहिती नाही. त्यामुळे खातेवाटपाचा विषय लांबच राहिला. आज केवळ फक्त राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा कसा उत्तम पार पडेल यावर आमची चर्चा झाली आहे. कार्यकर्त्यांची सोय कशी असेल, आमदारांना पास मिळाले की नाही. पक्ष कार्यालयातून समन्वय सुरू आहे. व्हिव्हिआयपी आज मोठ्या प्रमाणात मुंबईत असणार आहेत. अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार १०० टक्के होणार आहे. एनडीएच्या घटक पक्षांशी चर्चा होऊनच निर्णय घेतला जाईल असं अनिल पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, प्रत्येकाला वाटतं आपली मंत्रि‍पदावर वर्णी लागली पाहिजे. मागे झालेले मंत्री असो किंवा नवे कुणी असो सगळ्यांना मंत्रिपद हवं असते. कुणाला किती खाते मिळणार हे वरिष्ठ ठरवतील अशी माहिती अनिल पाटील यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : पालम तालुक्यातील रावराजूर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दि. १४ एप्रिल) विविध कार्यक्रमांचे उत्साहात...

Bopodi: बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती…

0
Times Of Maharashtra Desk, Pune: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक...

NCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक निरीक्षक दीपक...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : येथील बसस्थानकात सध्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना, प्रवाशांमध्ये विविध अफवा पसरत असल्याचे दिसून येत...

जय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कारखान्याच्या कार्यालयात कार्यस्थळावर ‘डॉ....

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय...

रावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : पालम तालुक्यातील रावराजूर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दि. १४ एप्रिल) विविध कार्यक्रमांचे उत्साहात...

Bopodi: बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती…

0
Times Of Maharashtra Desk, Pune: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक...

NCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक निरीक्षक दीपक...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : येथील बसस्थानकात सध्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना, प्रवाशांमध्ये विविध अफवा पसरत असल्याचे दिसून येत...

जय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कारखान्याच्या कार्यालयात कार्यस्थळावर ‘डॉ....

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय...
error: Content is protected !!