Homeताज्या बातम्याPMC Ward No. 5: विकासकामांचे यश, पण पूर आणि वाहतूक कोंडीचे प्रश्न...

PMC Ward No. 5: विकासकामांचे यश, पण पूर आणि वाहतूक कोंडीचे प्रश्न गंभीर; निवडणुकीत तगडी लढत!

Times of Maharashtra Desk, Pune: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ कल्याणीनगर-वडगाव शेरीमध्ये विकासकामांचा जोर असतानाही पूर, रस्त्यांचे रुंदीकरण आणि वाहतूक कोंडीचे प्रश्न आजही कायम आहेत. या मूलभूत समस्यांच्या पार्श्वभूमीवर या महत्त्वाकांक्षी प्रभागातील आगामी निवडणूक भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. पुण्याच्या प्रारूप प्रभाग रचनेतील हा पाचवा प्रभाग असून कल्याणीनगरपासून शांती रक्षक सोसायटी, पेपल सेमिनरीपर्यंत याचा विस्तार आहे.

या प्रभागाची एकूण लोकसंख्या ९१,३८१ इतकी आहे. प्रभागामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या ८,४०३ असून, अनुसूचित जमातीतील मतदारांची संख्या ७९ इतकी आहे.

कल्याणी नगर, रामवाडी, सैनिकवाडी, मते नगर, वडगांवशेरी गावठाण, कुमार प्रिमावीरा, गणेश नगर, बाजीराव नगर, महादेव नगर, गलांडे नगर, दिगंबर नगर, आगाखान पॅलेस, मेरिगोल्ड कॉम्प्लेक्स, ब्रम्हा सनसिटी, साईनाथ नगर, येरवडा स्टड फार्म, हर्म्स हेरीटेज, शांती रक्षक सोसायटी,पेपल सेमिनरी, जुना मुंढवा रस्ता, पुण्यनगरी आणि आनंद पार्क या भागामध्ये हा प्रभाग पसरलेला आहे.

आतापर्यंत झालेली विकासकामे

प्रभागात राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, क्रीडांगणे, नवीन पाणीटाक्या, लाइट हाऊस, कल्याणीनगर नदीवरील पूल अशा अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. तसेच प्रभाग टँकरमुक्त करण्याच्या दिशेनेही पाऊल टाकले गेले आहे.

तरीही या समस्या कायम

उज्ज्वल गार्डन, सैनिकवाडी, हरीनगर, कल्याणीनगर आणि इतर अनेक ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठून पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. ज्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते.

या भागामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असून छत्रपती संभाजी महाराज चौक ते सैनिकवाडीरस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. तसेच, डीपी रस्ते विकसित करणे आणि वडगाव शेरी ते वारजे नदीपात्रातील रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे.

अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेजलाइनचे लीकेज आणि काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार ड्रेनेजलाइन सुधारण्याची मागणी आहे.

या भागात सांस्कृतिक हॉलची कमतरता आहे. कल्याणीनगरमधील पब रात्री उशिरापर्यंत सुरू राहून रस्त्यावर होणारे पार्किंग तसेच अमिनिटी स्पेसच्या जागा विकसित न होणे, यांसारख्या समस्या कायम आहेत.

राजकीय चित्र आणि निवडणुकीचा इतिहास

विकासकामांवरील समाधान आणि समस्यांवरील असंतोष अशा दुहेरी परिस्थितीत हा प्रभाग निवडणुकीला सामोरे जात आहे.विधानसभा निवडणुकीमध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बापुसाहेब पठारे यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार गट) सुनील विजय टिंगरे यांचा ४,७१० मतांच्या फरकाने पराभव करून विजय मिळवला होता. २०१९ मध्ये सुनील टिंगरे यांनी भाजपचे जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता.

या प्रभागात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व गटातील इच्छुकांची भाऊगर्दी नेहमीच दिसून येते. ज्यामुळे मतविभाजनाचा फायदा कोणत्या उमेदवाराला होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!