सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) : भाजपने सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन भाजप नेते रणजीत देशमुख यांनी केले. निमगाव-देवपूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळावा व नांदूरशिंगोटे-देवपूर मंडळ कार्यकारिणी निवड कार्यक्रमात ते बोलत होते.
देशमुख म्हणाले की, ग्रामपंचायतींपासून केंद्र सरकारपर्यंत भाजपची सत्ता असल्याने गावांच्या विकासासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. संघटन अधिक मजबूत करून पक्षाचे उपक्रम व शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. तसेच मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेतही सक्रिय सहभाग घ्यावा.

यावेळी भाजप नेते उदय सांगळे यांनी बूथनिहाय नियुक्त कार्यकर्त्यांनी जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्याचे आवाहन केले. मजबूत संघटनामुळे पक्षाला बळ मिळते आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणे शक्य होते, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नांदूरशिंगोटे-देवपूर मंडळाच्या उपाध्यक्षपदी जालिंदर थोरात, अनिल गुरुळे, संदीप आव्हाड व गणेश चित्ते, तर सरचिटणीसपदी निवृत्ती सापनर यांची निवड करण्यात आली.
टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी नवनाथ आव्हाड सिन्नर






















