Homeताज्या बातम्याअजित पवारांनंतर राजकीय वारसा पुढे! सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी एन्ट्री

अजित पवारांनंतर राजकीय वारसा पुढे! सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी एन्ट्री

Times Of Maharashtra Desk : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.

शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार आहे.

पडद्यामागची ‘इनसाईड स्टोरी’ काय आहे? शपथविधी आजच का?

अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबात पक्षाची सूत्रे पुन्हा हाती घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. अजित पवारांनी बंड केले तेव्हा ते राजकारणात एकटे पडले होते. एकीकडे अजित पवार आणि दुसरीकडे संपूर्ण पवार कुटुंब अशी स्थिती निर्माण झाली होती.

अशा परिस्थितीत अजित पवारांनी ज्या कष्टाने पक्ष उभा केला, तो टिकवण्याची जबाबदारी पत्नी म्हणून सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली.
सुरुवातीला त्या यासाठी तयार नव्हत्या. मात्र, हे केलं नाही तर अजित पवारांचं स्वप्न अधूरं राहील” या भावनेतून त्यांनी जड अंतःकरणाने होकार दिला.

त्यामुळे आधी पक्ष मजबूत करणे आणि नंतर विलीनीकरणाबाबत चर्चा असा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. याच कारणामुळे आधी शपथविधी आणि त्यानंतर पुढील राजकीय निर्णय असा रोडमॅप ठरवण्यात आला आहे.

सुनेत्रा पवारांकडे कोणती खाती असणार?

अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपदासोबत अर्थसह महत्त्वाची खाती होती. मात्र सध्याच्या घडीला-

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ आज

राज्य उत्पादन शुल्क विभाग

क्रीडा विभाग

ही जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे कायम राहणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खात्याची जबाबदारी पुन्हा त्यांच्याकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आजच्या शपथविधीत फक्त सुनेत्रा पवारच शपथ घेणार असून अन्य कोणताही मंत्री शपथ घेणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!