Homeताज्या बातम्याअजित पवारांनंतर राजकीय वारसा पुढे! सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी एन्ट्री

अजित पवारांनंतर राजकीय वारसा पुढे! सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी एन्ट्री

Times Of Maharashtra Desk : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.

शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार आहे.

पडद्यामागची ‘इनसाईड स्टोरी’ काय आहे? शपथविधी आजच का?

अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबात पक्षाची सूत्रे पुन्हा हाती घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. अजित पवारांनी बंड केले तेव्हा ते राजकारणात एकटे पडले होते. एकीकडे अजित पवार आणि दुसरीकडे संपूर्ण पवार कुटुंब अशी स्थिती निर्माण झाली होती.

अशा परिस्थितीत अजित पवारांनी ज्या कष्टाने पक्ष उभा केला, तो टिकवण्याची जबाबदारी पत्नी म्हणून सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली.
सुरुवातीला त्या यासाठी तयार नव्हत्या. मात्र, हे केलं नाही तर अजित पवारांचं स्वप्न अधूरं राहील” या भावनेतून त्यांनी जड अंतःकरणाने होकार दिला.

त्यामुळे आधी पक्ष मजबूत करणे आणि नंतर विलीनीकरणाबाबत चर्चा असा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. याच कारणामुळे आधी शपथविधी आणि त्यानंतर पुढील राजकीय निर्णय असा रोडमॅप ठरवण्यात आला आहे.

सुनेत्रा पवारांकडे कोणती खाती असणार?

अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपदासोबत अर्थसह महत्त्वाची खाती होती. मात्र सध्याच्या घडीला-

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ आज

राज्य उत्पादन शुल्क विभाग

क्रीडा विभाग

ही जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे कायम राहणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खात्याची जबाबदारी पुन्हा त्यांच्याकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आजच्या शपथविधीत फक्त सुनेत्रा पवारच शपथ घेणार असून अन्य कोणताही मंत्री शपथ घेणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संतांच्या सानिध्यातच खरे सुख; भडंगवाडीत अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू असून भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या सप्ताहात बोलताना...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

संतांच्या सानिध्यातच खरे सुख; भडंगवाडीत अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू असून भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या सप्ताहात बोलताना...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...
error: Content is protected !!