Times of Maharashtra Desk: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना त्यांच्याच मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला आहे. ज्यामुळे तेलंगणाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.त्यांच्या मतदारसंघात सध्या तणावाचे वातावरण असून सरकारी निर्णयाचा निषेध करण्यासाठी व्यापारी समुदाय आणि स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरले आहेत.कोडंगल अभिवृद्धि परिरक्षण ऐक्य कार्य समितीच्या नेतृत्वाखाली, रहिवासी वैद्यकीय महाविद्यालय, पशुवैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय आणि यंग इंडिया इंटिग्रेटेड कॉलेज कोडंगलहून दुद्यल मंडळ येथे हलवण्याच्या निषेधार्थ रहिवासी रस्त्यावर उतरले असल्याची माहिती समोर आली आहे. ही आंदोलन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या मतदार संघात करण्यात येत आहे.
सरकारने दिलेली वाचने आणि आश्वासणे पाळली जात नाही म्हणून एक वृद्ध अंगणवाडी सेविकेने आवाज उठवायला सुरवात केली असून सरकारच्या मिड-डे मील योजनेअंतर्गत दिला जाणारा तांदूळ खूपच खराब आहे. तांदूळ शिजवल्यावर हलव्यासारखा होतो आणि मुलं ते खायला तयार नसतात. बारीक तांदूळ देण्याच्या नावाखाली खरंच मातीसारखा तांदूळ दिला जात आहे असा तिने आरोप केला आहे. तसेच त्यांनी दूसरा आरोप असा केला आहे की त्यांना सहा महिन्यांचा पगार अजून मिळालेला नाही आणि एक रुपयासुद्धा दिला गेलेला नाही. त्यामुळे त्यांना वृद्ध अवस्थेत व्याजावर पैसे घ्यावे लागत आहेत. स्वताचा हक्काचा पैसा मिळत नसल्यामुळे त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की जर लवकरच त्यांना पगार मिळाला नाही किंवा राशनाची गुणवत्ता सुधारली नाही, तर ती आणि तिच्या सहकाऱ्यांनी आंदोलन अधिक जोरात चालवले जाईल.ही फक्त एका महिलाची कथा नाही, तर तेलंगणातील अशा हजारो कर्मचाऱ्यांचा आवाज आहे, जे मुलांच्या भविष्यासाठी काम करत आहेत, पण स्वतः गरीबी आणि दुर्लक्षित जीवन जगत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
आज तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होतो. पण सरकारच्या या अन्याया विरोधात या मतदारसंघातील सर्वानी मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करत कोडंगल शहरातील बाजारपेठा पूर्णपणे बंद केल्या आहेत. लोकानी टाकलेल्या या बहिष्कारमुळे मुख्यमंत्र्यांसाठी त्यांच्याच गृह मतदारसंघातील ही आंदोलन ही मोठे आव्हान ठरू शकते.






















