Homeटेक्नॉलॉजीSanchar Sathi: संचार साथी ॲप ऐच्छिक, डिलीट करण्याची सोय उपलब्ध: केंद्रीय मंत्री...

Sanchar Sathi: संचार साथी ॲप ऐच्छिक, डिलीट करण्याची सोय उपलब्ध: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे स्पष्टीकरण!

Times of Maharashtra Desk, Pune: सरकारने स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप प्री-इंस्टॉल करण्याचा आदेश दिल्याच्या वृत्तांवर दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी संसदेबाहेर स्पष्टीकरण दिले आहे. हे ॲप वापरकर्त्यांसाठी ऐच्छिक असून ते डिलीट करण्याची सोय उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

नेमके काय म्हणाले मंत्री शिंदे?

मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले की, संचार साथी ॲप अनिवार्य नाही. “जर तुम्हाला हे ॲप नको असेल, तर तुम्ही ते डिलीट करू शकता. हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. तुम्हाला नोंदणी करायची नसेल, तर करू नका,” असे ते म्हणाले. या ॲपमुळे कोणतीही हेरगिरी किंवा कॉलवर पाळत ठेवली जात नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. स्मार्टफोनमध्ये सारखे ॲप्स जसे प्री-इंस्टॉल असतात, तसेच हे ॲपही असेल. वापरकर्त्यांना ते ठेवायचे की डिलीट करायचे, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे.

नेमका वाद कशावरून?

दूरसंचार विभागाने स्मार्टफोन कंपन्यांना मार्च २०२६ पासून विकल्या जाणाऱ्या सर्व नवीन डिव्हाइसेसमध्ये संचार साथी ॲप प्री-इंस्टॉल करण्याचे आणि ते डिसेबल किंवा प्रतिबंधित करता येणार नाही याची खात्री करण्याचे निर्देश दिले होते, असे वृत्त एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले होते. याच आदेशामुळे हे ॲप नागरिकांच्या गोपनीयतेवर गदा आणणारे पाळत ठेवणारे साधन असल्याची टीका विरोधी पक्षांकडून आणि डिजिटल हक्क कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती.

‘संचार साथी’ ॲप काय आहे?

संचार साथी ॲप हे मूळतः दूरसंचार विभागाने सायबर गुन्हे आणि फसवणूक रोखण्यासाठी विकसित केलेले एक सुरक्षा साधन आहे. हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल फोन ब्लॉक करणे आणि त्यांचा मागोवा घेणे, फसवणूक करण्याच्या उद्देशाने आलेल्या संशयास्पद कॉल्स, एसएमएस किंवा व्हॉट्सॲप मेसेजेसची तक्रार नोंदवणे, तुमच्या नावावर असलेले मोबाईल कनेक्शन तपासणे, मोबाईल हँडसेटची सत्यता तपासणे. इत्यादी सुविधा या अँप मध्ये उपलब्ध असतील.

या ॲपमुळे आतापर्यंत ३७ लाखांहून अधिक चोरीला गेलेले किंवा हरवलेले फोन ब्लॉक करण्यात आले आहेत आणि ७ लाखांहून अधिक फोन परत मिळवण्यात मदत झाली आहे, अशी माहिती सरकारने दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!