Homeताज्या बातम्याThackeray Alliance :शिवतीर्थ साक्षीला! बाळासाहेबांचे वारसदार एकत्र, राज–उद्धवांची युती जाहीर

Thackeray Alliance :शिवतीर्थ साक्षीला! बाळासाहेबांचे वारसदार एकत्र, राज–उद्धवांची युती जाहीर

Time of Maharashtra Desk: मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालेली दिसत आहे. ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अखेर जाहीर झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली ही युती बुधवारी वरळीतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अधिकृतरीत्या घोषित करण्यात आली.
या ऐतिहासिक क्षणा आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते. या दृश्याने कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.

 

“ज्यांचं महाराष्ट्रावर आणि मुंबईवर प्रेम आहे, त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं.” – राज ठाकरे यांची ठाम घोषणा

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “शिवसेना–मनसेची युती झाली आहे, हे मी अधिकृतपणे जाहीर करतो.” माझ्या एका मुलाखतीतील ‘महाराष्ट्र कोणत्याही भांडणापेक्षा मोठा आहे’ या विधानातूनच या युतीची सुरुवात झाली, असे त्यांनी स्पष्ट केले. जागावाटपाबाबत बोलताना त्यांनी मिश्किल टोला लगावत सांगितले की, “सध्या राजकारणात मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत, त्यामुळे उमेदवारीबाबत योग्य वेळी माहिती दिली जाईल.त्यानंतर ” राज ठाकरे यांनी जनतेला थेट आवाहन करत सांगितले,“ज्यांचं महाराष्ट्रावर आणि मुंबईवर प्रेम आहे, त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं.”
तसंच त्यांनी ठामपणे सांगितले की, “मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि तो आमचाच असेल.”

“भाजपला मुंबईचे लचके तोडायचे आहेत. आता आम्ही भांडत राहिलो, तर संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान होईल.” – उद्धव ठाकरे यांचा आक्रमक इशारा

यावेळी उद्धव ठाकरे यांनीही जोरदार भाषण करत भाजपवर थेट हल्ला चढवला आहे. “भाजपला मुंबईचे लचके तोडायचे आहेत. आता आम्ही भांडत राहिलो, तर संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान होईल.” म्हणून ही युती कर्तव्य आणि कायमस्वरूपी एकत्र राहण्यासाठी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. “मुंबई किंवा महाराष्ट्राकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहील, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
मराठी माणसाला उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, “आता चुकाल तर संपल. मराठीचा वसा टाकू नका.”

सात महानगरपालिकांमध्ये एकत्र लढणार
ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे मुंबईसह सात महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणं बदलणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे युग’ पुन्हा जोरात परतल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता मुंबई आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी ही युती किती निर्णायक ठरणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!