Times of Maharashtra Desk, KDMC Election Mumbai: महाराष्ट्रात ठाकरे आणि शिंदे हे दोन्ही गट नेहमी चर्चेत असतात. सध्या आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी ही दोन्ही गट आपआपली रणनीती आखत आहेत. ठाणे कल्याण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आणि याच बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेंच्या गटातील माजी महापौर रमेश जाधव यांनी मशालीची साथ सोडत धनुष्यबाण हातात घेतला आहे. रमेश जाधवांच्या या पक्षप्रवेशामुळे आगामी केडीएमसी निवडणुकी पूर्वीच राजकारणात मोठी खळबळ उडाली असून ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे.
कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेवर नेहमी सर्वांचे लक्ष असते, आणि आशातच कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेचे माजी महापौर रमेश जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यांच्या या पक्षप्रवेशामुळे कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीची समीकरणे बद्दलणार का असा प्रश्न सर्वाना पडला आहे.
हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृवखाली काल 14 नोव्हेंबर रोजी पार पडला. स्थानिक महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत.सर्व पक्षात निवडणुकांची जय्यत तयारी सुरू आहे. आणि यातच मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे , शिवसेना शहरप्रमुख नीलेश शिंदे आणि संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत जाधव यांनी धनुष्यबाण हाती घेतला आहे. त्याच्या या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गट अधिक बळकट होईल असे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे.
महापौर म्हणून कार्यरत असताना जाधव यांनी कल्याण परिसरात मजबूत पक्षसंघटना उभी केली आहे. त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे. त्यांनी परिसरात अनेक विकासकामे आगदी चोख केली आहेत त्यामुळे त्यांचे असे सोडून जाणे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का असून आता कल्याण- डोंबिवली निवडणुकीची गणिते बदलणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकीत शिंदे गट आणखीन मजबुतीने निवडणूक लढण्याची तयार करत आहे यात काही शंका नाही. आता कल्याण डोंबिवली नगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे बघण्यासरखे असेल. तसेच यापुढे उद्धव ठाकरे कोणती रणनीती आखणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.






















