Times Of Maharashtra Desk :
महाराष्ट्र राज्यातील पत्रकारिता व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार–२०२६ जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा हा मान मा. श्री. विनोदजी सुधाकर पवार (जळगाव) यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा आयोजकांकडून करण्यात आली आहे।
पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने निर्भीड व समाजाभिमुख लेखन करत तसेच समाजसेवेत सक्रिय सहभाग नोंदवत विनोद पवार यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, जनजागृती करणे आणि सर्वसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे या कार्यामुळे त्यांना हा प्रतिष्ठेचा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार सोहळा दि. २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार भवन पुणे येथे पार पडणार असून, या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन निलाय इव्हेंट्स, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विनोद पवार यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे जळगाव जिल्ह्याचा मान उंचावला असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






















