Homeताज्या बातम्यामाणुसकीचा झरा जपणाऱ्या वसंत कापसे यांचा "जीवन आरोग्य दूत" पुरस्काराने गौरव

माणुसकीचा झरा जपणाऱ्या वसंत कापसे यांचा “जीवन आरोग्य दूत” पुरस्काराने गौरव

निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले): आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या व्यक्ती विरळाच आढळतात. मात्र, कोठुरे येथील ज्येष्ठ नागरिक, तुळजा भवानी ज्येष्ठ नागरिक संघाचे सक्रिय सदस्य व समाजसेवक श्री. वसंत नारायण कापसे यांनी आपल्या कृतीतून माणुसकीचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय समाजोपयोगी कार्याची दखल घेत त्यांना “जीवन आरोग्य दूत” पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या सन्मानामागे एक हृदयस्पर्शी घटना आहे. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते सुधाकर रावजी मोगल हे काही दिवसांपूर्वी नाशिकहून रात्रीच्या प्रवासाला निघाले होते. मात्र, संबंधित बस चालकाने त्यांना नियोजित ठिकाणी न उतरवता रस्त्यातच उतरवून दिले. अंधार, निर्जन परिसर आणि मदतीसाठी कोणीही नसलेल्या परिस्थितीत त्यांना अचानक पक्षाघाताचा (पॅरालिसिस) झटका आला. त्यामुळे ते रस्त्याच्या कडेला असहाय्य अवस्थेत पडून राहिले.

पहाटेच्या सुमारास आपल्या शेताकडे जात असताना वसंत कापसे यांच्या नजरेस ही घटना पडली. त्यांनी कोणताही विचार न करता तातडीने मदतीचा हात पुढे केला. संबंधित व्यक्तीला त्वरित दवाखान्यात दाखल केले, त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली आणि योग्य उपचार मिळवून दिले. वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे सुधाकर मोगल यांचे प्राण वाचले.

या मानवतावादी कार्याची दखल घेत मोगल परिवार, कोठुरे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्या वतीने वसंत कापसे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा गौरव म्हणून त्यांना “जीवन आरोग्य दूत” पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना वसंत कापसे यांनी समाजाला एक महत्त्वपूर्ण संदेश दिला. “सरकारी असो किंवा खासगी वाहतूक सेवा, प्रत्येक चालक आणि वाहकाने माणुसकी जपत प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कोणत्याही प्रवाशाला निर्जन ठिकाणी उतरविण्याऐवजी त्याला सुरक्षितपणे बसस्थानक किंवा नियोजित ठिकाणी पोहोचविणे हे कर्तव्य समजले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कडक नियम व संवेदनशीलता निर्माण व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाकडे निवेदन सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वसंत नारायण कापसे यांनी दाखविलेली माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि संकटसमयी धावून जाण्याची वृत्ती ही समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या कार्यामुळे “माणुसकी हाच खरा धर्म” या उक्तीची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...
error: Content is protected !!