Homeउद्योगसेंद्रिय शेतीचा नवा मंत्र: गेगावमध्ये शेती शाळेत प्रत्यक्ष प्रशिक्षण

सेंद्रिय शेतीचा नवा मंत्र: गेगावमध्ये शेती शाळेत प्रत्यक्ष प्रशिक्षण

Times Of Maharashtra Desk : गेगाव (ता. शहापूर,) येथे विठ्ठल मंदिर परिसरात दुसरी शेती शाळा मोठ्या उत्साहात आणि शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. या कार्यक्रमाला गावातील शेतकरी, कृषीप्रेमी, महिला शेतकरी तसेच युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या शेती शाळेचा आजचा मुख्य विषय बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क तयार करण्याच्या पद्धती व त्यांचा शेतीतील प्रभावी वापर हा होता. सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल लक्षात घेता या विषयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमादरम्यान तज्ञांनी बीज प्रक्रिया करण्यासाठी बीजामृत तयार करण्याची पद्धत सविस्तर समजावून सांगितली. तसेच जमिनीतील सूक्ष्मजीवांची वाढ करून सुपीकता वाढविण्यासाठी जीवामृत व घनजीवामृत कसे उपयुक्त ठरते यावर मार्गदर्शन केले. पिकांवरील किड व रोग नियंत्रणासाठी निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क तयार करण्याच्या सोप्या व घरच्या घरी करता येणाऱ्या पद्धतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

या नैसर्गिक उपाययोजनांमुळे रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होते, तसेच मातीची गुणवत्ता सुधारते आणि शेती अधिक शाश्वत बनते, असे तज्ञांनी स्पष्ट केले. उपस्थित शेतकऱ्यांनीही या पद्धतींबाबत उत्सुकता दर्शवत विविध प्रश्न विचारले.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले तसेच प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना या संकल्पना अधिक स्पष्टपणे समजल्या. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात या पद्धतींचा अवलंब करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या शेती शाळेचे आयोजन माऊली युवा शेतकरी गट, गेगाव यांच्या वतीने करण्यात आले असून, युवा शेतकरी व कृषी मित्र हर्षल डोंगरे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. त्यांच्या प्रयत्नांमुळे गावात सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत होत आहे.

गावातील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, भविष्यातही अशा प्रकारच्या शेती शाळांचे आयोजन करावे, अशी मागणी व्यक्त करण्यात आली. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासोबतच पारंपरिक ज्ञानाचा संगम साधता येऊन शेती अधिक प्रगत व फायदेशीर होण्यास मदत होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!