Homeताज्या बातम्यागोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात 'आधार' आणि 'सेतू' केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना खिरापत

Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी आधार सेवा केंद्र आणि ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (सेतू) वाटपात गंभीर अनियमितता केल्याचा प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकारातून (RTI) प्राप्त झालेल्या कागदपत्रांमुळे जिल्हा प्रशासनातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असून, यात मोठ्या आर्थिक उलाढालीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही माहिती इम्रान कुरेशी यांनी दिली आहे.

SOP आणि शासन नियमांकडे दुर्लक्ष
शासनाच्या नियमानुसार, आधार किट वाटपासाठी विशिष्ट ‘मानक कार्यप्रणाली’ (SOP) निश्चित केलेली आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात ४१ नवीन आधार किटचे वाटप करताना या नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली. आर्थिक वर्षात किमान ५०० ट्रान्झॅक्शनची अट असताना, ती पूर्ण न करणाऱ्या आणि आधार ऑपरेटर प्रमाणपत्र नसलेल्या व्यक्तींनाही संगनमताने किट देण्यात आल्याचे उघड झाले आहे.

घोटाळ्याचे मुख्य मुद्दे :
१. पारदर्शकतेचा अभाव: आधार किट वाटपाची प्रक्रिया जिल्हाधिकारी पोर्टल किंवा कोणत्याही सार्वजनिक माध्यमावर प्रसिद्ध न करता छुप्या पद्धतीने राबवण्यात आली.

२. एकाच कुटुंबात अनेक केंद्रे: नियमानुसार एका कुटुंबात एकच केंद्र देणे बंधनकारक असताना, अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्यांना अनेक केंद्रे वाटप करण्यात आली आहेत.

३. खाजगी लोकेशन्सवर केंद्रे: अनेक आधार केंद्रे कोणत्याही शासकीय एनओसी (NOC) शिवाय खाजगी जागेत सुरू आहेत, जे नियमांचे थेट उल्लंघन आहे.

४. कागदपत्रांची हेराफेरी: काही केंद्रांवर पोर्टलवर नाव एकाचे आणि मोबाईल नंबर-ईमेल दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे आढळले आहे. तसेच आर्थिक वर्षाच्या तारखांमध्ये फेरफार करून अपात्रांना पात्र ठरवण्यात आले.

५. शासकीय कर्मचाऱ्यांचेही हात ओले: विशेष म्हणजे, काही ठिकाणी चक्क शासकीय कर्मचाऱ्यांच्या नावावरही केंद्रे सुरू असल्याचे RTI मधून स्पष्ट झाले आहे.

अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी आणि महा-IT च्या विशिष्ट कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. विभागीय आयुक्त, नागपूर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देऊन तीन महिने उलटले तरी, स्थानिक स्तरावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट, तक्रारदाराला बदनाम करून बातम्या दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप इम्रान कुरेशी यांनी केला आहे. आता या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी प्रजीत नायर त्यांचे देखील हात ओले आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाग 1

क्रमशः

लवकरच आणखीन एक मोठा घोटाळा येणार समोर…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!