Homeमहाराष्ट्रम्हसवडमध्ये पाणीटंचाईचा तीव्र प्रश्न नागरिकांचा टाहो प्रशासन जागे होणार का

म्हसवडमध्ये पाणीटंचाईचा तीव्र प्रश्न नागरिकांचा टाहो प्रशासन जागे होणार का

म्हसवड (प्रतिनिधी महेश कांबळे) : शहरात सध्या पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिकांना तब्बल १० ते १२ दिवसांनी पिण्याचे पाणी मिळत आहे. या विस्कळीत पुरवठ्यामुळे सर्वसामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिकच तीव्र झाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

शहरातील जुन्या जलवाहिन्या वारंवार फुटत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. जीवन प्राधिकरणाची योजना कार्यरत असली तरी ती कालबाह्य ठरल्याने समस्यांमध्ये भर पडत आहे. विशेष म्हणजे, नवीन जलयोजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होऊनही नागरिकांना अपेक्षित दिलासा मिळालेला नाही. पालिकेने नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण केले असले तरी त्याचे प्रत्यक्ष फायदे अद्याप नागरिकांपर्यंत पोहोचलेले नाहीत.

पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी २४ तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून नागरिकांनी एकहाती सत्ता दिली. मात्र, सत्तेचा कारभार हाती घेतल्यानंतरही पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. उन्हाचा पारा ४० अंशांच्या जवळ पोहोचल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. घामाने अंग चिंब होत असताना पिण्याचे पाणीच उपलब्ध नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

ग्रामीण भागातील नागरिकांप्रमाणेच आता शहरातील लोकांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे “२४/७ पाणी नको, निदान चार दिवसांतून एकदा तरी पाणी द्या” अशी साधी मागणी नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी सांगितले की, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. नवीन जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याची चाचणी (टेस्टिंग) करून पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. तोपर्यंत गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तथापि, नागरिकांचा संयम संपत चालला असून लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा निघावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. प्रशासन आणि सत्ताधारी यांची कसोटी आता लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूरात जल्लोष! बबनराव चौधरींच्या नियुक्तीने कार्यकर्त्यांत उत्साह

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा प्रभारी यांची निवड जाहिर केली असुन त्यात नंदुरबार भारतीय जनता...

१२९ वर्षांच्या परंपरेला नवी दिशा, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम; गोदरेज समूहाचा नवा प्रवास सुरू

0
Times Of Maharashtra Desk : मुंबई गोदरेज उद्योग समूह या १२९ वर्षांच्या परंपरा असलेल्या समूहाने आपली नवी ब्रँड ओळख आणि भविष्यातील धोरण जाहीर केले....

जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे आढळली मानवी कवटी; दहिवडी पोलिसांकडून तपास सुरू

0
माण (प्रतिनिधी धनंजय कवडे) : माण तालुक्यातील शिंगणापूर गावाच्या हद्दीत एक बेवारस मानवी कवटी आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे...

शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचाराची वाळवी! ४१९ तोळे सोने अन् कोट्यवधींची माया; दीड दिवसात जामीन?

0
पुणे : ज्यांच्या खांद्यावर शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता टिकवण्याची जबाबदारी होती, तेच 'शालार्थ आयडी' घोटाळ्याच्या चौकशीचे प्रमुख आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष...

रोहन ओव्हाळ खून प्रकरणाचा मास्टरमाईंड जेरबंद; मार्केटयार्ड पोलिसांची ६ तासांत धडाकेबाज कारवाई

0
Times Of Maharashtra Desk : शहरात खळबळ उडवून देणाऱ्या प्रसिद्ध रॅपर आणि रील स्टार रोहन कांतीलाल ओव्हाळ याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात...

शिरपूरात जल्लोष! बबनराव चौधरींच्या नियुक्तीने कार्यकर्त्यांत उत्साह

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा प्रभारी यांची निवड जाहिर केली असुन त्यात नंदुरबार भारतीय जनता...

१२९ वर्षांच्या परंपरेला नवी दिशा, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम; गोदरेज समूहाचा नवा प्रवास सुरू

0
Times Of Maharashtra Desk : मुंबई गोदरेज उद्योग समूह या १२९ वर्षांच्या परंपरा असलेल्या समूहाने आपली नवी ब्रँड ओळख आणि भविष्यातील धोरण जाहीर केले....

जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे आढळली मानवी कवटी; दहिवडी पोलिसांकडून तपास सुरू

0
माण (प्रतिनिधी धनंजय कवडे) : माण तालुक्यातील शिंगणापूर गावाच्या हद्दीत एक बेवारस मानवी कवटी आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे...

शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचाराची वाळवी! ४१९ तोळे सोने अन् कोट्यवधींची माया; दीड दिवसात जामीन?

0
पुणे : ज्यांच्या खांद्यावर शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता टिकवण्याची जबाबदारी होती, तेच 'शालार्थ आयडी' घोटाळ्याच्या चौकशीचे प्रमुख आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष...

रोहन ओव्हाळ खून प्रकरणाचा मास्टरमाईंड जेरबंद; मार्केटयार्ड पोलिसांची ६ तासांत धडाकेबाज कारवाई

0
Times Of Maharashtra Desk : शहरात खळबळ उडवून देणाऱ्या प्रसिद्ध रॅपर आणि रील स्टार रोहन कांतीलाल ओव्हाळ याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात...
error: Content is protected !!