गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): तालुका प्रतिनिधी विष्णू गायकवाडपैठण तालुक्यातील नवगाव तुळजापूर ग्रामपंचायत कार्यालयास क्रांती महिला असंघटित कामगार युनियनच्या वतीने -स्वच्छ पिण्याचे पाण्याची व्यवस्था करणे व मुलभूत हक्काच्या सुविधा मिळणे बाबत इत्यादी मागणीचे निवेदन दिनांक पाच जून रोजी समस्त महिला कामगार युनियनच्या माध्यमातून समस्त गावातील महिला व सर्व ग्रामस्थ तुळजापूर गावात राहत असून आम्हाला मागील 50 वर्षापासून राहत आहोत.
मागील 30 वर्षापासून स्वच्छ पिण्याचे पाणी व सांडपाणी देखील ग्रामपंचातच्या माध्यमातून मिळत नाही. तसेच गावातील विविध समस्या असून यामध्ये प्रमुख्याने गावातील रस्ता गावातील नाली गटार या समस्या जास्त आहेत तसेच गावात गेल्या 30 वर्षापासून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आम्ही सर्व ग्रामस्थ वारंवार ग्रामपंचायतला याबाबत लेखी तोंडी स्वरूपात मागणी करून ही अद्याप पर्यत गावातील पाणीपुरवठा योजना सुरळीत झाली नाही तरी लवकर स्वच्छ पाणीपुरवठा योजना त्वरित निर्णय घेऊन सुरु करण्यात यावी नसता आम्ही सर्व ग्रामस्थ गटविकास अधिकारी कार्यालय पैठण या ठिकाणी आमरण उपोषण करू यामध्ये काही दुर्दैवी घटना

पिण्याच्या पाण्यावरून झाल्यास याची जबाबदारी पूर्णपणे ग्रामपंचायतचे असेल याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर 100 महिलांच्या स्वाक्षऱ्याचे पत्र ग्रामपंचायत कार्यालयात अंजुम ईसाक पठाण यांच्या मार्गदर्शना निवेदन देण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत शेकडो महिला उपस्थित होत्या






















