Homeआरोग्यआई-वडिलांच्या स्मृतींना अन्नदानातून अभिवादन; स्वराज्य निवारा वृद्धाश्रमात भावनिक उपक्रम

आई-वडिलांच्या स्मृतींना अन्नदानातून अभिवादन; स्वराज्य निवारा वृद्धाश्रमात भावनिक उपक्रम

माणगाव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) :
आई-वडिलांचे ऋण शब्दांत व्यक्त करणे अशक्य असते, मात्र त्यांच्या स्मृती जपण्याचा आणि समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर व भावनिक प्रयत्न गोरेगाव येथील एचपी गॅस व्यावसायिक अमित वसंतराव कांबळे यांनी केला. त्यांच्या आई-वडिलांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त महाड तालुक्यातील कोंडीवते येथील स्वराज्य निवारा वृद्धाश्रमात अन्नदानाचा अर्थपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी आरपीआयचे महाड तालुका अध्यक्ष मोहन खांबे, सचिव लक्ष्मण जाधव, पत्रकार नवनाथ लोकरे, गोरेगावचे उद्योजक किशोर म्हसकर, महाडचे प्रसिद्ध वकील भिसे साहेब, तसेच अमित गॅस एजन्सीचे मॅनेजर रामस्वरूप तोडाणी, कर्मचारी राकेश खिचड आणि यश हॉटेलचे मालक यश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमांतर्गत एकूण ३८ वयोवृद्धांना दोन्ही वेळचे अन्नदान करण्यात आले. त्यामध्ये २३ पुरुष व १५ महिला लाभार्थींचा समावेश होता. सर्वांना प्रेमाने व सन्मानाने भोजन देण्यात आले. अनेक वृद्धांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना “आज आम्हाला आपल्या घरच्यांची आठवण झाली,” अशा भावना व्यक्त केल्या. त्यामुळे वातावरण अत्यंत भावनिक झाले होते.

अमित कांबळे यांनी यावेळी सांगितले की, आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांमुळेच आज आम्ही समाजात उभे आहोत. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त केवळ विधी न करता, समाजातील गरजू घटकांसाठी काहीतरी करावे, ही भावना मनात होती. वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची सेवा हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे.

या उपक्रमातून समाजाला एक सकारात्मक संदेश देण्यात आला-आई-वडिलांच्या स्मृती फक्त पूजा-अर्चा किंवा विधींमध्ये न अडकता, समाजोपयोगी कार्यातून जपल्या तर त्याचे खरे सार्थक होते. आजच्या धावपळीच्या जीवनात वृद्धांची काळजी घेणे ही केवळ कर्तव्य नव्हे, तर एक सामाजिक जबाबदारी आहे, याची जाणीव या कार्यक्रमातून प्रकर्षाने झाली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी अमित कांबळे यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत, अशा सामाजिक उपक्रमांची गरज आजच्या काळात अधिक असल्याचे मत व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!