Homeताज्या बातम्यापुणे कोथरूड, हडपसरच्या जागेवरून ताणेबाणे; 'मविआ' च्या बैठकीला उद्धव ठाकरे गट गैरहजर...

पुणे कोथरूड, हडपसरच्या जागेवरून ताणेबाणे; ‘मविआ’ च्या बैठकीला उद्धव ठाकरे गट गैरहजर…

पुणे : काँग्रेस भवनमध्ये शनिवारी दुपारी महाविकास आघाडीची निवडणूक पूर्व संयुक्त बैठक पार पडली. यात शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहिले नसल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईत बैठकीला गेल्याचे सांगण्यात आले.

हडपसर, तसेच कोथरूड या दोन जागांवरून महाविकास आघाडीतीलकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात मतभेद झाल्याचे सूत्रांकडून कळते.

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर,  तसेच दोन्ही पक्षांचे शहरातील इच्छुक, त्यांचे समर्थक कार्यकर्ते व संघटनात्मक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान, मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना शहराध्यक्ष, जिल्हाप्रमुख यांची बैठक बोलावली आहे, त्यामुळे शहरातील संजय मोरे व गजानन थरकुडे हे त्या बैठकीसाठी मुंबईत गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याशिवाय शिवसेनेचे अन्य कोणी पदाधिकारीही बैठकीला हजर नव्हते. त्याची चर्चा सुरू झाल्यावर अन्य पदाधिकाऱ्यांकडून ही माहिती बैठकीतील उपस्थितांना देण्यात आली.

राज्य सरकारच्या विरोधात जनमत आहे. ते मतदानामध्ये परावर्तित करायचे असेल, तर महाविकास आघाडी एकसंघपणे काम करताना दिसायला हवी. मतभेद, एकमेकांबद्दलचा राग विसरायला हवा. तसे झाले, तर यश मिळेल, असे मत बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केले. उमेदवार तुमचा-आमचा असे केले तर तोटा होईल. ज्या मतदारसंघात काम करता तिथेच राहून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून काम करायचे, शेजारच्या मतदारसंघात आमच्या पक्षाचा उमेदवार आहे, तिथे जाऊन काम केले तर त्याचा परिणाम मतांवर होतो. त्यामुळे असे करणे टाळावे, असा सल्लाही या नेत्यांनी दिला.

कोथरूड शिवसेनेला, तर हडपसर राष्ट्रवादीला ?

शिवसेनेने हडपसर व कोथरूड या दाेन जागांचा आग्रह महाविकास आघाडीत धरला आहे. यातील हडपसरच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आग्रही आहे, तर कोथरूडची जागा काँग्रेसला हवी आहे. यामध्ये कोथरूडची जागा शिवसेनेला देऊन हडपसरची जागा राष्ट्रवादीला ठेवावी, अशी तडजोड करण्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!