Times Of Maharashtra Desk : पुणे लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या घरावर टाकण्यात आलेल्या धाडीमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेख नामक या महिलेच्या निवासस्थानी व त्यांच्या भाड्याने दिलेल्या टपरीवर पोलीसांनी धाड टाकून तपासणी केली; मात्र या कारवाईदरम्यान एकही महिला पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे, तपासणीत कोणतेही बेकायदेशीर साहित्य आढळून आले नाही.
सदर महिला यांची टपरी भाडे तत्वावर दिलेली असून, पूर्वीच्या भाडेकरूविरुद्ध कारवाई झाल्यानंतर त्यांनी त्याला काढून टाकले होते. सध्याचा भाडेकरू नियमांचे पालन करत असल्याचे सांगितले जात असतानाही पोलीसांकडून वारंवार तपासणी केली जात असल्याने छळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकरणाची माहिती पत्रकार मुज्जम्मील शेख यांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्याकडून पत्रकारांशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. तसेच पत्रकारांना अप्रत्यक्ष धमक्या दिल्याची नोंद करण्यात आली आहे.
यावेळी कोणताही ठोस पुरावा नसताना वरिष्ठांसमोर आपली प्रतिमा मालिन होऊ नये म्हणून, संबंधित महिलेकडे तंबाकू विक्री होत असल्याचे बोगस आरोप करण्यात आले, ज्यामुळे प्रकरण अधिकच वादग्रस्त झाले आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस प्रशासनाच्या कारवाईच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
तसेच पुण्यात अनेक गुन्हे पोलिसांवर ही दाखल झाले आहे की यामध्ये बोगस गुन्ह्यात अडकवतो अश्या धमक्यांविरोधात 3 पोलिसांवर गुन्हा दाखल होऊन ही लष्कर पोलीस आम्ही पोलीस आयुक्तांना घाबरत नाही असे चित्र दिसत आहे.
या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली असून, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.






















