Homeताज्या बातम्याGovernment Water Scheme:"हर घर जल" हा शासनाचा उपक्रम फक्त कागदावरच पूर्णा तालुक्यातील...

Government Water Scheme:”हर घर जल” हा शासनाचा उपक्रम फक्त कागदावरच पूर्णा तालुक्यातील अनेक गावातील नळ कोरडे

Times of Maharashtra Desk Government Water Scheme: परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात “हर घर जल” हा शासनाचा उपक्रम फक्त कागदावरच आहे की काय? असा प्रश्न पडला आहे. तालुक्यातील गावांमध्ये शासनाकडून जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे परंतु योजना चालू झाली तरी येथील बऱ्याच गावातील नळ अद्यापही कोरडेच आहेत. या योजनेसाठी शासना कडून कोट्यावधीची निधी मंजूर होऊन देखील अजूनही इथल्या अनेक गावात पाणी पुरवठा सुरू झाला नाही. ज्या अभियंताना या योजनेचे काम दिले होते त्याच्या हलगर्जीपणामुळे या योजनेची दुर्दशा झाली आहे. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

नेमकी योजना काय?
जलजीवन योजने अंतर्गत गावात पाण्याच्या टाक्या बसवणे, पाइपलाइन टाकणे , नळ जोडणे व संपूर्ण गावाला पाणी पुरवणे ही कामे करण्यात येणार होती. या कामांची जबाबदारी ठेकेदारांना देण्यात आली होती. ही कामे काही भागात पूर्ण झाली आहेत, तर काही भागात अद्यापही कामे कासवाच्या गतीने चालू आहेत. काम पूर्ण झालेल्या भागात देखील अद्याप पाणी सुरू झाले नाही. यावरून शासनाने दिलेला निधी वाया गेला असेच चित्र दिसत आहेत.
ही योजना ग्रामपंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली राबवण्यात येत असून त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही योजना नुसती कागदापुरती मर्यादित राहिली आहे असे ग्रामस्थानेचे म्हणणे आहे. ठेकेदाराकडून बऱ्याच ठिकाणी कामे अर्धवट ठेवण्यात आली आहेत, तर जिथे कामे पूर्ण झाली आहेत तिथे अद्यापही पाणीपुरवठा झालेला नाही. येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी गेल्यावर उपविभागाव व कनिष्ठ अभियंते कार्यालयात हजर नसल्याचे वारंवार दिसते. अनेकदा त्यांच्या कक्षांना कुलूप असते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सरकारने खबरदारी घ्यावी व लवकरात लवकर कारवाई करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!