Homeताज्या बातम्या"शिवसैनिकांनी विकासाचे दूत व्हावे" – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे...

“शिवसैनिकांनी विकासाचे दूत व्हावे” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे…

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आणि सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन…

 

पुणे (टाईम्स ऑफ महाराष्ट्र ब्युरो) : आज पुण्यात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आणि शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात डॉ. गोऱ्हे यांनी विविध योजनांचा आढावा घेत कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधिलकीचे महत्त्व पटवून दिले.

“शिवसैनिकांनी आता सत्तेत असल्याचा फायदा घेऊन विकासाचे दूत म्हणून काम करावे,” असा ठाम संदेश डॉ. गोऱ्हे यांनी दिला. त्यांनी पुढे सांगितले की, “शिंदे सरकारने महिलांसाठी ‘आनंदाचा शिधा’, ‘लाडकी बहीण’ यांसारख्या अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. याबाबत कार्यकर्त्यांनी अधिकाधिक जनजागृती करून लोकांना त्याचा लाभ मिळवून दिला पाहिजे.”

👇👇👇 Advertisement 👇👇👇


👆👆👆 Advertisement 👆👆👆

मेळाव्यादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी सभासद नोंदणी मोहीम २५ ते २७ एप्रिल रोजी पुण्यातील लाल महाल, वडगाव शेरी, पर्वती, कोथरूड आणि कसबा याठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवली जाणार असल्याचे जाहीर केले.

या कार्यक्रमात नितीन पवार, बाळासाहेब मालुसरे, आनंद गोयल यांनी आयोजक म्हणून भूमिका बजावली. तर पूजा रावेतकर, सुदर्शना त्रिगुणाईत (संपर्क प्रमुख), सुनील जाधव आणि युवा सेनेचे प्रमुख निलेश गिरमे, युवा सेना सचिव किरण साळी यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “आपल्या सत्तेत असूनही जर आपण निष्क्रिय राहिलो, तर जनतेचा विश्वास डळमळीत होईल. म्हणूनच आता आपण प्रत्येक प्रभागात सक्रिय राहून शिवसेनेच्या विचारसरणीचा प्रसार करायला हवा. जुने-नवे कार्यकर्ते एकत्र येऊन संघटनेला बळकट करावे.”

त्यांनी ‘महायुती’तील समन्वय, आगामी निवडणुका, आरक्षण व्यवस्थापन, महिलांचा सहभाग, आणि कामगार-विद्यार्थी हिताच्या योजना यावरही ठामपणे आपली भूमिका मांडली.

“आजचा मेळावा म्हणजे संघटनात्मक बळाचे प्रतीक आहे. शिवसेनेच्या पुढील वाटचालीत कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करत जनतेचा विश्वास जिंकला पाहिजे,” असे उद्गार उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शेवटी काढले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...
error: Content is protected !!