Homeताज्या बातम्याराज्यातील शालेय शिक्षण विभागातील वशिलेबाजीचा कहर ; निष्क्रीय अधिकाऱ्यांना मिळताहेत महत्त्वाच्या पदांचे...

राज्यातील शालेय शिक्षण विभागातील वशिलेबाजीचा कहर ; निष्क्रीय अधिकाऱ्यांना मिळताहेत महत्त्वाच्या पदांचे अतिरिक्त कार्यभार…

राज्यातील शालेय शिक्षण विभागात वशिलेबाजीचा कहर ; निष्क्रीय अधिकाऱ्यांना मिळताहेत महत्त्वाच्या पदांचे अतिरिक्त कार्यभार…

पुणे : राज्य शालेय शिक्षण विभागात सध्या वशिलेबाजी आणि अनियमिततेची मोठी चर्चा रंगली आहे. विविध कार्यालयातील रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार देताना वशिलेबाजीच्या जोरावर निष्क्रीय आणि चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक सक्षम आणि पात्र अधिकारी नाराज असून, शिक्षण व्यवस्थेत अस्वस्थता पसरली आहे.
राज्यातील नऊ प्रमुख कार्यालयांतील शिक्षण उपसंचालकांची पदे रिक्त असून, या पदांचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, यामध्ये वशिलेबाजीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषत: चौकशीच्या कचाट्यात असलेले डॉ. वंदना वाहुळ (पुणे), ज्योती शिंदे (मुंबई बोर्ड), आणि रजनी रावडे (शिक्षण आयुक्तालय) यांच्यासारखे अधिकारी महत्त्वाच्या पदांवर बसविण्यात आले आहेत, ज्यामुळे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
वशिलेबाजीचा शिरकाव :-
सेंट्रल बिल्डिंगमधील एका संचालक कार्यालयात या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. पात्र असलेल्या अधिकाऱ्यांना दूर ठेवून, फक्त सोयीसाठी वशिलेबाजीच्या जोरावर कार्यभार देण्यात येत आहे. या अनियमिततेमुळे काही अधिकाऱ्यांनी न्यायासाठी मॅटकडे धाव घेण्याची तयारी केली असून, काहींनी पदोन्नतीपासून वंचित राहिल्यामुळे मानसिक तणावातून स्वेच्छानिवृत्तीचा विचार सुरू केला आहे.
पदोन्नती नाकारण्याचे वाढते प्रमाण :-
शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती नाकारली असून, शिवलिंग पटवे (अमरावती) यांनीही नागपूर बोर्डाच्या अध्यक्षपदी पदोन्नती स्वीकारलेली नाही. यामुळे शिक्षण विभागात वशिलेबाजीची चळवळ आणि पदोन्नती प्रक्रियेतून होणारी अनियमितता उघड होत आहे.
अधिकार्‍यांचा संताप :-
वरिष्ठ अधिकाऱ्यांना या वशिलेबाजीचा फायदा मिळाल्याने, शिक्षण व्यवस्थेत कार्यरत दिग्गज अधिकारी आपापल्या हक्कांसाठी लढण्याची तयारी करत आहेत. या वशिलेबाजीमुळे शिक्षण व्यवस्थेचा विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, विभागातील असंतोष उफाळून आला आहे.
शिक्षण विभागाच्या व्यवस्थेमध्ये एक स्फोटक स्थिती निर्माण झाली असून, योग्य ती पावले उचलली नाहीत तर पुढील काळात अनेक अधिकारी न्यायासाठी आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : पालम तालुक्यातील रावराजूर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दि. १४ एप्रिल) विविध कार्यक्रमांचे उत्साहात...

Bopodi: बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती…

0
Times Of Maharashtra Desk, Pune: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक...

NCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक निरीक्षक दीपक...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : येथील बसस्थानकात सध्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना, प्रवाशांमध्ये विविध अफवा पसरत असल्याचे दिसून येत...

जय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कारखान्याच्या कार्यालयात कार्यस्थळावर ‘डॉ....

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय...

रावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : पालम तालुक्यातील रावराजूर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दि. १४ एप्रिल) विविध कार्यक्रमांचे उत्साहात...

Bopodi: बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती…

0
Times Of Maharashtra Desk, Pune: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक...

NCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक निरीक्षक दीपक...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : येथील बसस्थानकात सध्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना, प्रवाशांमध्ये विविध अफवा पसरत असल्याचे दिसून येत...

जय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कारखान्याच्या कार्यालयात कार्यस्थळावर ‘डॉ....

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय...
error: Content is protected !!