Homeताज्या बातम्याराज्यातील शालेय शिक्षण विभागातील वशिलेबाजीचा कहर ; निष्क्रीय अधिकाऱ्यांना मिळताहेत महत्त्वाच्या पदांचे...

राज्यातील शालेय शिक्षण विभागातील वशिलेबाजीचा कहर ; निष्क्रीय अधिकाऱ्यांना मिळताहेत महत्त्वाच्या पदांचे अतिरिक्त कार्यभार…

राज्यातील शालेय शिक्षण विभागात वशिलेबाजीचा कहर ; निष्क्रीय अधिकाऱ्यांना मिळताहेत महत्त्वाच्या पदांचे अतिरिक्त कार्यभार…

पुणे : राज्य शालेय शिक्षण विभागात सध्या वशिलेबाजी आणि अनियमिततेची मोठी चर्चा रंगली आहे. विविध कार्यालयातील रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार देताना वशिलेबाजीच्या जोरावर निष्क्रीय आणि चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक सक्षम आणि पात्र अधिकारी नाराज असून, शिक्षण व्यवस्थेत अस्वस्थता पसरली आहे.
राज्यातील नऊ प्रमुख कार्यालयांतील शिक्षण उपसंचालकांची पदे रिक्त असून, या पदांचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, यामध्ये वशिलेबाजीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषत: चौकशीच्या कचाट्यात असलेले डॉ. वंदना वाहुळ (पुणे), ज्योती शिंदे (मुंबई बोर्ड), आणि रजनी रावडे (शिक्षण आयुक्तालय) यांच्यासारखे अधिकारी महत्त्वाच्या पदांवर बसविण्यात आले आहेत, ज्यामुळे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
वशिलेबाजीचा शिरकाव :-
सेंट्रल बिल्डिंगमधील एका संचालक कार्यालयात या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. पात्र असलेल्या अधिकाऱ्यांना दूर ठेवून, फक्त सोयीसाठी वशिलेबाजीच्या जोरावर कार्यभार देण्यात येत आहे. या अनियमिततेमुळे काही अधिकाऱ्यांनी न्यायासाठी मॅटकडे धाव घेण्याची तयारी केली असून, काहींनी पदोन्नतीपासून वंचित राहिल्यामुळे मानसिक तणावातून स्वेच्छानिवृत्तीचा विचार सुरू केला आहे.
पदोन्नती नाकारण्याचे वाढते प्रमाण :-
शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती नाकारली असून, शिवलिंग पटवे (अमरावती) यांनीही नागपूर बोर्डाच्या अध्यक्षपदी पदोन्नती स्वीकारलेली नाही. यामुळे शिक्षण विभागात वशिलेबाजीची चळवळ आणि पदोन्नती प्रक्रियेतून होणारी अनियमितता उघड होत आहे.
अधिकार्‍यांचा संताप :-
वरिष्ठ अधिकाऱ्यांना या वशिलेबाजीचा फायदा मिळाल्याने, शिक्षण व्यवस्थेत कार्यरत दिग्गज अधिकारी आपापल्या हक्कांसाठी लढण्याची तयारी करत आहेत. या वशिलेबाजीमुळे शिक्षण व्यवस्थेचा विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, विभागातील असंतोष उफाळून आला आहे.
शिक्षण विभागाच्या व्यवस्थेमध्ये एक स्फोटक स्थिती निर्माण झाली असून, योग्य ती पावले उचलली नाहीत तर पुढील काळात अनेक अधिकारी न्यायासाठी आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...
error: Content is protected !!